शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षवल्ली आम्हा सोयरे... लॉकडाऊन काळात कृषी विद्यापीठाने केली १३ लाख रोपांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 09:27 IST

दापाेली : लॉकडाऊन काळातही दापोली कोकण कृषी विद्यापीठाने यंदा सुमारे १३ लाख कलम रोपांची विक्रमी विक्री केली आहे. ही ...

दापाेली : लॉकडाऊन काळातही दापोली कोकण कृषी विद्यापीठाने यंदा सुमारे १३ लाख कलम रोपांची विक्रमी विक्री केली आहे. ही सर्व रोपे शेतकऱ्यांनी १५ जूनपूर्वीच उचलली असून, त्यातून कोकण कृषी विद्यापीठाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे.

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, जांभूळ, मसाला पिके यासारख्या कलमांच्या रोपांची विक्रमी विक्री झाली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी एक महिना आधीच कोकण कृषी विद्यापीठातील सर्वच नर्सरीतील कलम रोपे संपली आहेत़ यावर्षी विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे कलमे रोपे विकली आहेत़

राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कलम रोपांची उचल केली आहे. त्यामुळे जूनपूर्वीच विद्यापीठातील पालघर ते सिंधुदुर्ग या सर्वच जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाच्या नर्सरीतील कलम रोपे संपली आहेत. यावर्षी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कृषी विद्यापीठाने रोपांची निर्मिती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, यावर्षी पंधरा लाख रुपये तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाची शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता त्या त्या रोपांची निर्मिती वाढवण्यात येणार असल्याचे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी सांगितले

कृषी विद्यापीठातील खास कलम रोपे उचलण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, पुणे या जिल्ह्यातील शेतकरी येत आहेत. हापूस, केशर, रत्ना या आंब्याच्या कलम रोपांची मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत. तसेच यावर्षी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नारळ रोपांची सुद्धा मोठ्या प्रमाणात उचल हाेत आहे. तसेच कृषी विद्यापीठाच्या बाहडोली या जांभळाच्या रोपांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात उचल केली आहे.

------------------

दापोली कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांची विश्‍वासार्हता जपली असून, योग्य दरात चांगली दर्जेदार कलम रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यशस्वी झाले आहे. त्यामुळेच राज्यातील विविध भागांतील शेतकरी कृषी विद्यापीठातील रोपांची उचल करीत आहेत.

- डॉ. पराग हळदणकर, संशोधन संचालक

------------------------

दापोली कोकण कृषी विद्यापीठातील हापूस आंब्याच्या कलम रोपांप्रमाणेच केशर, रत्ना, आंब्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणात उचल घाटमाथ्यावरील शेतकरी करीत आहेत. यावर्षी कृषी विद्यापीठाने टी. दी. नारळ, बाणवली नारळ, बहाडाेली जांभूळची विक्रमी उचल शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पुढीलवर्षी या सर्व कलम रोपांची निर्मिती वाढविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. शेतकऱ्यांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे.

- अरुण माने, उपसंचालक बियाणे कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

टॅग्स :dapoli-acदापोलीagricultureशेती