शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

आशापुरा मायनिंग कंपनीच्या सुनावणीत ग्रामस्थ आक्रमक,  कंपनीला विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 15:43 IST

दापोली तालुक्यातील आशापुरा मायनिंग कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये उंबरशेत, रोवले येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीला विरोध कायम ठेवला. या कंपनीमुळे आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच हाणून पाडली.

ठळक मुद्देआशापुरा मायनिंग कंपनीच्या सुनावणीत ग्रामस्थ आक्रमक,  कंपनीला विरोध कायम आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याने विरोध

दापोली : तालुक्यातील आशापुरा मायनिंग कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये उंबरशेत, रोवले येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीला विरोध कायम ठेवला. या कंपनीमुळे आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच हाणून पाडली.महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय यांच्या आदेशानुसार उंबरशेत, उटंबर खाणपट्ट्यातील खनिकर्मच्या उत्खननाबाबत दापोलीतील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील जनतेच्या हरकती असल्यास जनसुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहून हरकती नोंदविता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. काही लोकांच्या विरोधामुळे आशापुरा मायनिंग गेले वर्षभर बंद आहे. मायनिंगच्या उत्खननाला काही लोकांचा विरोध असल्याने आशापुरा मायनिंग कंपनी बंद आहे. त्यामुळे या जनसुनावणीत ग्रामस्थांची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागले होते.जनसुनावणीसाठी केळशी परिसरातील ग्रामस्थ सकाळपासूनच शासकीय विश्रामगृहाबाहेर जमले होते. जनसुनावली सुरूवात होताच ग्रामस्थांनी कंपनी विरोधी भूमिका घेण्यास सुरूवात केली. खाणपट्ट्यात सुरू असलेल्या मायनिंगमुळे या भागातील आंबा, काजूच्या बागा नष्ट होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी कंपनीला आपला विरोध कायम ठेवला.

या सुनावणीवेळी ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच उधळून लावल्याने अधिकाऱ्यांनीही ही सुनावणी थांबवली. ग्रामस्थांच्या या विरोधी भूमिकेमुळे आशापुरा मायनिंग कंपनीचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी