शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आशापुरा मायनिंग कंपनीच्या सुनावणीत ग्रामस्थ आक्रमक,  कंपनीला विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 15:43 IST

दापोली तालुक्यातील आशापुरा मायनिंग कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये उंबरशेत, रोवले येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीला विरोध कायम ठेवला. या कंपनीमुळे आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच हाणून पाडली.

ठळक मुद्देआशापुरा मायनिंग कंपनीच्या सुनावणीत ग्रामस्थ आक्रमक,  कंपनीला विरोध कायम आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याने विरोध

दापोली : तालुक्यातील आशापुरा मायनिंग कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये उंबरशेत, रोवले येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीला विरोध कायम ठेवला. या कंपनीमुळे आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच हाणून पाडली.महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय यांच्या आदेशानुसार उंबरशेत, उटंबर खाणपट्ट्यातील खनिकर्मच्या उत्खननाबाबत दापोलीतील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील जनतेच्या हरकती असल्यास जनसुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहून हरकती नोंदविता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. काही लोकांच्या विरोधामुळे आशापुरा मायनिंग गेले वर्षभर बंद आहे. मायनिंगच्या उत्खननाला काही लोकांचा विरोध असल्याने आशापुरा मायनिंग कंपनी बंद आहे. त्यामुळे या जनसुनावणीत ग्रामस्थांची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागले होते.जनसुनावणीसाठी केळशी परिसरातील ग्रामस्थ सकाळपासूनच शासकीय विश्रामगृहाबाहेर जमले होते. जनसुनावली सुरूवात होताच ग्रामस्थांनी कंपनी विरोधी भूमिका घेण्यास सुरूवात केली. खाणपट्ट्यात सुरू असलेल्या मायनिंगमुळे या भागातील आंबा, काजूच्या बागा नष्ट होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी कंपनीला आपला विरोध कायम ठेवला.

या सुनावणीवेळी ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच उधळून लावल्याने अधिकाऱ्यांनीही ही सुनावणी थांबवली. ग्रामस्थांच्या या विरोधी भूमिकेमुळे आशापुरा मायनिंग कंपनीचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी