शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रत्नागिरीत खड्डे पेटले, राजकीय रणकंदन सुरू; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:26 IST

माजी खासदार नीलेश राणे यांनीही या विषयात उडी घेतली

रत्नागिरी : शहरात पडलेल्या खड्ड्यांबाबत ‘आम्ही रत्नागिरीकर’ म्हणून बोलावलेली सभा उधळली गेल्यानंतर आता त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सोशल मीडियावरही हा विषय वादाचा झाला असून, सामंत समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांनीही या विषयात उडी घेतली आहे. कोणत्याही विषयावर बोलावलेली सभा होऊ न देणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना या विषयात ठाम भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नगर परिषदेपर्यंत लाेकभावना पोहोचिवण्यासाठी ‘आम्ही रत्नागिरीकर’ म्हणून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करत सोशल मीडियावरून एकत्र येण्याची हाक देण्यात आली. रविवार, २८ रोजी दुपारी त्यासाठी सभा बोलावण्यात आली होती. या सभेला शिंदेसेनेचे पदाधिकारीही पोहोचले. केवळ एकाच बाजूने आणि एकाच विषयावर चर्चा नको, अशी भूमिका मांडत या पदाधिकाऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत केलेल्या कामांची यादीच सभेत सादर केली. मारुती मंदिरापर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे आणि त्यापुढील रस्त्यांचेही काँक्रिटीकरण लवकरच होणार आहे. पाऊस कमी झाल्यानंतर ते काम हाती घेतले जाणार आहे, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी मांडली.मंत्री सामंत यांच्याविरोधात कोणी आकसाने सभा घेणार असेल, त्यांना विनाकारण लक्ष्य केले जाणार असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याने पुढे सभा झालीच नाही.रविवारी संध्याकाळी हा विषय चांगलाच पसरला आणि सोशल मीडियावर त्यावरून वादावादी सुरू झाली. सामंत समर्थकांनी रत्नागिरीत झालेल्या कामांची उजळणी केली, तर विरोधकांनी सभा होऊ दिली नाही, यावरून जोरदार टीका सुरू केली आहे. दोन्ही बाजूने यावर जाेरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी