शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

एक महिन्याच्या झुंजीनंतर संतोष देवरूखकर यांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 14:22 IST

corona virus, accident, ratnagirinews मुंबईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेने अचानक दापोली कोविड सेंटरकडे वळण घेतले आणि जीव भांड्यात पडला. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि आपण संपलो, असा विचार मनात येऊन गेला. परंतु, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तब्बल एक महिन्याच्या यशस्वी झुंजीनंतर आपण कोरोनावर मात केली आहे, असे भावनिक उद्गार आहेत कोरोनावर मात केलेल्या संतोष देवरुखकर यांचे.

ठळक मुद्देमुंबईकडे निघालेली रुग्णवाहिकेने धरला कोविड सेंटरचा मार्ग दापोलीतील डॉक्टरांकडून उपचार

शिवाजी गोरेदापोली : मुंबईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेने अचानक दापोली कोविड सेंटरकडे वळण घेतले आणि जीव भांड्यात पडला. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि आपण संपलो, असा विचार मनात येऊन गेला. परंतु, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तब्बल एक महिन्याच्या यशस्वी झुंजीनंतर आपण कोरोनावर मात केली आहे, असे भावनिक उद्गार आहेत कोरोनावर मात केलेल्या संतोष देवरुखकर यांचे.अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे कळताच संतोष देवरुखकर यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता आपले नक्कीच काहीतरी बरेवाईट होणार, असा विचार मनामध्ये येऊ लागला. नातेवाईकांनी त्यांना मुंबईला नेण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु, अचानक मुंबईला जाण्याचा बेत बदलला आणि रुग्णवाहिकेने थेट कोविड सेंटरचा रस्ता धरला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ९२ टक्के फुफ्फुस निकामी झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्याही परिस्थितीत नातेवाईकांनी आपल्याला दापोलीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.परंतु, नीलेश शेठ यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये उपचार करण्याचा सल्ला दिला. तसेच डॉ. महेश भागवत, डॉ. सुयोग भागवत यांच्यावर नातेवाईकांनी विश्वास ठेवला. उपचाराकरिता दाखल झाल्यावर पहिले काही दिवस खूप तणावाखाली होते. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी यांनी उपचार सुरु केले. रुग्णालयातील डॉक्टरांवर विश्वास ठेवल्यानेच आजारातून बाहेर आल्याचे देवरुखकर म्हणाले.

दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर मध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. शासनाकडून इंजेक्शन, औषध, उपलब्ध करून दिले आहेत. फिजिशियन असून, सर्व सहकाऱ्यांच्या जोरावर मृत्यू दर घटविण्यात यश मिळवले आहे. तसेच बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.- डॉ. महेश भागवत, अधीक्षक, उप जिल्हा रुग्णालयात, दापोली

दापोली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये समाधानकारक काम होत आहे. दापोलीत सेंटर झाल्याने लोकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. पुणे, मुंबईकडे जाणारे रुग्ण दापोलीत उपचार घेत आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.- नीलेश सेठ, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी