शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर टेंभ्ये ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:47 IST

रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल्याने ग्रामस्थांनी मतदान करण्यास संमती दर्शवली आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर टेंभ्ये ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळारस्त्याअभावी अडचण, ग्रामपंचायतीने रस्त्याची मोजणी करण्याचे आदेश

रत्नागिरी : तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल्याने ग्रामस्थांनी मतदान करण्यास संमती दर्शवली आहे.टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ग्रामस्थांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे, अशा आशयाचे पत्र ग्रामस्थांनी रत्नागिरीचेतहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडे दिले होते. या पत्राची तातडीने दखल घेत तहसीलदार जाधव यांनी शनिवारी तक्रारदार, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी व गटविकास अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली होती.

या बैठकीत त्यांनी सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर या रस्त्याचे अंतर समजण्यासाठी ग्रामपंचायतीने रस्त्याची मोजणी करून घ्यावी व त्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण २६ नंबरला आहे किंवा नाही, त्याची माहिती घ्यावी. हे अतिक्रमण २६ नंबरवर असेल तर ग्रामपंचायत कारवाई करेल, असे जाधव यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसेल तर कलम १४३ अन्वये तहसीलदार कारवाई करतील, असेही त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने ही कार्यवाही करण्यात येईल. तोपर्यंत ग्रामस्थांनी सध्या आहे त्या मार्गाचा वापर करावा, अशी सूचना केली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय मागे घेऊन २३ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले.

तहसीलदार जाधव यांनी ग्रामस्थांच्या पत्राची तातडीने दखल घेऊन त्यावर केलेल्या कार्यवाहीबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच तहसीलदार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी २३ एप्रिल रोजी मतदान करू ,असे आश्वासन तहसीलदार यांना या बैठकीमध्ये दिले.मतदान करून फोन करा!रत्नागिरीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ग्रामस्थांच्या मतदान न करण्याच्या निर्णयाची तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने दखल घेऊन तोडगा काढला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर मला फोन करून सांगा, असेही तहसीलदार यांनी ग्रामस्थांना सांगितले.

टॅग्स :VotingमतदानRatnagiriरत्नागिरीTahasildarतहसीलदार