शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
5
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
6
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
7
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
8
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
9
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
10
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
11
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
12
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
13
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
14
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
15
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
16
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
17
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
18
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
19
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
20
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर टेंभ्ये ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:47 IST

रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल्याने ग्रामस्थांनी मतदान करण्यास संमती दर्शवली आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर टेंभ्ये ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळारस्त्याअभावी अडचण, ग्रामपंचायतीने रस्त्याची मोजणी करण्याचे आदेश

रत्नागिरी : तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल्याने ग्रामस्थांनी मतदान करण्यास संमती दर्शवली आहे.टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ग्रामस्थांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे, अशा आशयाचे पत्र ग्रामस्थांनी रत्नागिरीचेतहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडे दिले होते. या पत्राची तातडीने दखल घेत तहसीलदार जाधव यांनी शनिवारी तक्रारदार, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी व गटविकास अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली होती.

या बैठकीत त्यांनी सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर या रस्त्याचे अंतर समजण्यासाठी ग्रामपंचायतीने रस्त्याची मोजणी करून घ्यावी व त्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण २६ नंबरला आहे किंवा नाही, त्याची माहिती घ्यावी. हे अतिक्रमण २६ नंबरवर असेल तर ग्रामपंचायत कारवाई करेल, असे जाधव यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसेल तर कलम १४३ अन्वये तहसीलदार कारवाई करतील, असेही त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने ही कार्यवाही करण्यात येईल. तोपर्यंत ग्रामस्थांनी सध्या आहे त्या मार्गाचा वापर करावा, अशी सूचना केली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय मागे घेऊन २३ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले.

तहसीलदार जाधव यांनी ग्रामस्थांच्या पत्राची तातडीने दखल घेऊन त्यावर केलेल्या कार्यवाहीबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच तहसीलदार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी २३ एप्रिल रोजी मतदान करू ,असे आश्वासन तहसीलदार यांना या बैठकीमध्ये दिले.मतदान करून फोन करा!रत्नागिरीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ग्रामस्थांच्या मतदान न करण्याच्या निर्णयाची तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने दखल घेऊन तोडगा काढला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर मला फोन करून सांगा, असेही तहसीलदार यांनी ग्रामस्थांना सांगितले.

टॅग्स :VotingमतदानRatnagiriरत्नागिरीTahasildarतहसीलदार