शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर टेंभ्ये ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:47 IST

रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल्याने ग्रामस्थांनी मतदान करण्यास संमती दर्शवली आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर टेंभ्ये ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळारस्त्याअभावी अडचण, ग्रामपंचायतीने रस्त्याची मोजणी करण्याचे आदेश

रत्नागिरी : तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल्याने ग्रामस्थांनी मतदान करण्यास संमती दर्शवली आहे.टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ग्रामस्थांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे, अशा आशयाचे पत्र ग्रामस्थांनी रत्नागिरीचेतहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडे दिले होते. या पत्राची तातडीने दखल घेत तहसीलदार जाधव यांनी शनिवारी तक्रारदार, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी व गटविकास अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली होती.

या बैठकीत त्यांनी सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर या रस्त्याचे अंतर समजण्यासाठी ग्रामपंचायतीने रस्त्याची मोजणी करून घ्यावी व त्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण २६ नंबरला आहे किंवा नाही, त्याची माहिती घ्यावी. हे अतिक्रमण २६ नंबरवर असेल तर ग्रामपंचायत कारवाई करेल, असे जाधव यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसेल तर कलम १४३ अन्वये तहसीलदार कारवाई करतील, असेही त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने ही कार्यवाही करण्यात येईल. तोपर्यंत ग्रामस्थांनी सध्या आहे त्या मार्गाचा वापर करावा, अशी सूचना केली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय मागे घेऊन २३ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले.

तहसीलदार जाधव यांनी ग्रामस्थांच्या पत्राची तातडीने दखल घेऊन त्यावर केलेल्या कार्यवाहीबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच तहसीलदार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी २३ एप्रिल रोजी मतदान करू ,असे आश्वासन तहसीलदार यांना या बैठकीमध्ये दिले.मतदान करून फोन करा!रत्नागिरीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ग्रामस्थांच्या मतदान न करण्याच्या निर्णयाची तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने दखल घेऊन तोडगा काढला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर मला फोन करून सांगा, असेही तहसीलदार यांनी ग्रामस्थांना सांगितले.

टॅग्स :VotingमतदानRatnagiriरत्नागिरीTahasildarतहसीलदार