शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

मिरकरवाडामध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा, कारवाईबाबत प्रशासनाची कडक भूमिका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 09:50 IST

मिरकरवाडा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मासेमारी बंदर आहे.

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराचा विकास करण्यासाठी तेथील किनाऱ्यावर असलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. या मोहिमेबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यामुळे सर्वच लोकांनी आपले सामान तेथून हलवले होते.

मिरकरवाडा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मासेमारी बंदर आहे. मिरकरवाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय विभाग या बंदराचा विकास करणार आहे. गेली अनेक वर्षे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे असल्याने या बंदरातील विकास कामे थांबली होती. मात्र आता राजकीय पातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली आणि बंदर विकासाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे किनारपट्टीवर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला आहे.

23 जानेवारीला ही कारवाई केली जाणार होती. मात्र आम्हाला सामान हलवण्यासाठी पर्यायी जागा द्यावी आणि वेळ द्यावा, अशी मागणी मच्छीमारांनी केली असल्याने कारवाई तीन दिवस पुढे ढकलण्यात आली. सामान हलवण्यासाठी 26 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. सोमवार 27 रोजी बांधकामे हटवण्यात येतील, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. यावेळी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत असलेली ठाम भूमिका पाहून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांनी तीन दिवसात आपले सामान हलवले आहे.

सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून जेसीबीच्या सहाय्याने बांधकामे पडण्यास सुरुवात झाली आहे. किनारपट्टी पूर्ण मोकळी झाल्यानंतर मिरकरवाडा विकास आराखड्यानुसार तातडीने काम सुरू केले जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी