शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

मिरकरवाडामध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा, कारवाईबाबत प्रशासनाची कडक भूमिका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 09:50 IST

मिरकरवाडा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मासेमारी बंदर आहे.

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराचा विकास करण्यासाठी तेथील किनाऱ्यावर असलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. या मोहिमेबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यामुळे सर्वच लोकांनी आपले सामान तेथून हलवले होते.

मिरकरवाडा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मासेमारी बंदर आहे. मिरकरवाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय विभाग या बंदराचा विकास करणार आहे. गेली अनेक वर्षे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे असल्याने या बंदरातील विकास कामे थांबली होती. मात्र आता राजकीय पातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली आणि बंदर विकासाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे किनारपट्टीवर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला आहे.

23 जानेवारीला ही कारवाई केली जाणार होती. मात्र आम्हाला सामान हलवण्यासाठी पर्यायी जागा द्यावी आणि वेळ द्यावा, अशी मागणी मच्छीमारांनी केली असल्याने कारवाई तीन दिवस पुढे ढकलण्यात आली. सामान हलवण्यासाठी 26 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. सोमवार 27 रोजी बांधकामे हटवण्यात येतील, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. यावेळी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत असलेली ठाम भूमिका पाहून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांनी तीन दिवसात आपले सामान हलवले आहे.

सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून जेसीबीच्या सहाय्याने बांधकामे पडण्यास सुरुवात झाली आहे. किनारपट्टी पूर्ण मोकळी झाल्यानंतर मिरकरवाडा विकास आराखड्यानुसार तातडीने काम सुरू केले जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी