शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
3
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
4
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
5
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
6
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
7
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
8
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
9
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
10
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
11
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
12
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
13
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
14
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
15
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
16
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
17
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

मिरकरवाडामध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा, कारवाईबाबत प्रशासनाची कडक भूमिका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 09:50 IST

मिरकरवाडा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मासेमारी बंदर आहे.

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराचा विकास करण्यासाठी तेथील किनाऱ्यावर असलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. या मोहिमेबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यामुळे सर्वच लोकांनी आपले सामान तेथून हलवले होते.

मिरकरवाडा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मासेमारी बंदर आहे. मिरकरवाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय विभाग या बंदराचा विकास करणार आहे. गेली अनेक वर्षे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे असल्याने या बंदरातील विकास कामे थांबली होती. मात्र आता राजकीय पातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली आणि बंदर विकासाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे किनारपट्टीवर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला आहे.

23 जानेवारीला ही कारवाई केली जाणार होती. मात्र आम्हाला सामान हलवण्यासाठी पर्यायी जागा द्यावी आणि वेळ द्यावा, अशी मागणी मच्छीमारांनी केली असल्याने कारवाई तीन दिवस पुढे ढकलण्यात आली. सामान हलवण्यासाठी 26 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. सोमवार 27 रोजी बांधकामे हटवण्यात येतील, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. यावेळी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत असलेली ठाम भूमिका पाहून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांनी तीन दिवसात आपले सामान हलवले आहे.

सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून जेसीबीच्या सहाय्याने बांधकामे पडण्यास सुरुवात झाली आहे. किनारपट्टी पूर्ण मोकळी झाल्यानंतर मिरकरवाडा विकास आराखड्यानुसार तातडीने काम सुरू केले जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी