शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

यापुढे चौपदरीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:19 IST

highway Chiplun Ratnagiri- यापुढे प्रशासनाला ग्रामस्थ सहकार्य करणार नाहीत. अगदी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी चालेल. काम सुरू केले तर दहा हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा पेढे-परशुराम संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देयापुढे चौपदरीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य नाही पेढे-परशुराम संघर्ष समितीचा इशारा

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी जमिनीच्या कुळांची प्रशासनाला सहकार्य करण्याची मानसिकता आता राहिलेली नाही. उलट संबंधित शेतकरी आत्महत्या व आत्मदहन करण्याच्या तयारीत आहेत.

या परिस्थितीला परशुराम देवस्थान जबाबदार असून, त्यांच्या दबावाखाली प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनाला ग्रामस्थ सहकार्य करणार नाहीत. अगदी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी चालेल. काम सुरू केले तर दहा हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा पेढे-परशुराम संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिला.पेढेचे सरपंच प्रवीण पाकळे यांनी सांगितले की, पेढे व परशुराम येथील नुकसानभरपाईच्या वादावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री परब यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना रत्नागिरीत बैठकीसाठी निमंत्रित केले होते.

या बैठकीत पालकमंत्री डॉ. अनिल परब यांनी न्यायालयीन बाबींसाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले, तर ही समस्या मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर समिती नेमण्याबाबत कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. त्यावर ग्रामस्थ व संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांचे समाधान झालेले नाही. याबाबत समिती अध्यक्ष विश्‍वास सुर्वे, जनार्दन मालवणकर, सुधीर गमरे म्हणाले की, मुळात १९७२ मध्ये सातबाऱ्यावर देवस्थानचे नाव चुकीच्या पद्धतीने लागले आहे.आत्मदहनाचा मार्ग?५० वर्षांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेचा निकाल लागलेला नाही. त्यातच या विषयावरून नव्याने दावे दाखल झालेले आहेत. वर्षानुवर्षे या समस्या मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थ आत्मदहन करण्याच्या मार्गावर आहेत.भरपाईचा तिढा आधीपेढे व परशुराम या दोन्ही गावांतील शेतकरी व ग्रामस्थांची महामार्गाचे काम सुरू करू देण्यास मानसिकता राहिलेली नाही. समिती, ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान सुरू आहे. लोकप्रतिनीधीही हा विषय गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने भरपाईचा तिढा अगोदर सोडवावा. त्यानंतर काम सुरू करावे, असे सांगितले. यावेळी संघर्ष समितीचे सचिव सुधीर गमरे, तुषार गमरे, संदीप माळी उपस्थित होते.

टॅग्स :highwayमहामार्गChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी