शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे चौपदरीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:19 IST

highway Chiplun Ratnagiri- यापुढे प्रशासनाला ग्रामस्थ सहकार्य करणार नाहीत. अगदी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी चालेल. काम सुरू केले तर दहा हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा पेढे-परशुराम संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देयापुढे चौपदरीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य नाही पेढे-परशुराम संघर्ष समितीचा इशारा

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी जमिनीच्या कुळांची प्रशासनाला सहकार्य करण्याची मानसिकता आता राहिलेली नाही. उलट संबंधित शेतकरी आत्महत्या व आत्मदहन करण्याच्या तयारीत आहेत.

या परिस्थितीला परशुराम देवस्थान जबाबदार असून, त्यांच्या दबावाखाली प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनाला ग्रामस्थ सहकार्य करणार नाहीत. अगदी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी चालेल. काम सुरू केले तर दहा हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा पेढे-परशुराम संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिला.पेढेचे सरपंच प्रवीण पाकळे यांनी सांगितले की, पेढे व परशुराम येथील नुकसानभरपाईच्या वादावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री परब यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना रत्नागिरीत बैठकीसाठी निमंत्रित केले होते.

या बैठकीत पालकमंत्री डॉ. अनिल परब यांनी न्यायालयीन बाबींसाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले, तर ही समस्या मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर समिती नेमण्याबाबत कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. त्यावर ग्रामस्थ व संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांचे समाधान झालेले नाही. याबाबत समिती अध्यक्ष विश्‍वास सुर्वे, जनार्दन मालवणकर, सुधीर गमरे म्हणाले की, मुळात १९७२ मध्ये सातबाऱ्यावर देवस्थानचे नाव चुकीच्या पद्धतीने लागले आहे.आत्मदहनाचा मार्ग?५० वर्षांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेचा निकाल लागलेला नाही. त्यातच या विषयावरून नव्याने दावे दाखल झालेले आहेत. वर्षानुवर्षे या समस्या मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थ आत्मदहन करण्याच्या मार्गावर आहेत.भरपाईचा तिढा आधीपेढे व परशुराम या दोन्ही गावांतील शेतकरी व ग्रामस्थांची महामार्गाचे काम सुरू करू देण्यास मानसिकता राहिलेली नाही. समिती, ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान सुरू आहे. लोकप्रतिनीधीही हा विषय गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने भरपाईचा तिढा अगोदर सोडवावा. त्यानंतर काम सुरू करावे, असे सांगितले. यावेळी संघर्ष समितीचे सचिव सुधीर गमरे, तुषार गमरे, संदीप माळी उपस्थित होते.

टॅग्स :highwayमहामार्गChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी