शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या कल्पना चांगल्या! अंमलबजावणीचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 19:16 IST

केवळ पर्यटनातून जिल्ह्याचा विकास शक्य आहे. मात्र त्यात खूप अडचणी आहेत. अतिवृष्टी, पुरामुळे पावसाळ्यात पर्यटक कोकणात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन हा बारमाही व्यवसाय होत नाही. त्याला उद्योगांची जोड गरजेची आहे.

मनोज मुळ्येरत्नागिरी : पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा विकास, बीच शॅक्स, निवास न्याहरी योजनेबाबतचे धोरण या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या कोकण दौऱ्यात मांडलेल्या याेजना उत्तम आहेत. कोकण हिताच्या आहेत; पण त्याच्या अंमलबजावणीबाबत तितकेच गांभीर्य दाखवले जाणे गरजेचे आहे. अनेकदा योजना उत्तम तयार होतात, मात्र अंमलबजावणीच्या स्तरावर त्याची गडबड होते आणि त्यातून कोणालाच फायदा होत नाही.आदित्य ठाकरे यांनी तब्बल तीन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोकणचा शाश्वत विकास या मुद्द्यावर भर दिला. इथले पर्यावरण, निसर्ग टिकवून स्थानिकांच्या हाताला काम मिळवून देणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पर्यटन विभाग आखत असलेल्या योजनांवर त्यांनी भाष्य केले. त्याचवेळी उद्योग, मोठे प्रकल्प याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली. युवा पिढीतील नेतृत्त्वाकडून याच अपेक्षा आहेत.मंत्री ठाकरे यांनी मांडलेल्या कल्पना, पर्यटन विभाग राबवणार असलेली धोरणे हे सर्व कागदावर चांगलेच आहे. पण त्या केवळ कागदावर चांगल्या असल्याने कोकणाचा विकास होणार नाही. त्यासाठी कदाचित मोठी आर्थिक तरतूदही होईल; पण जोपर्यंत त्याची अंमलबजावणी योग्य होत नाही, तोपर्यंत त्या फायद्याच्या ठरणार नाहीत. त्यासाठी योजनांचा पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी, योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे सरकारी अधिकारी आणि लाभ घेणारे स्थानिक या साऱ्यांचा त्यातील प्रामाणिक सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जर या गोष्टींकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष ठेवले तर कोकणाच्या अर्थकारणाला वळण लागू शकेल, हे नक्की.बीच शॅक्स धोरण लवकरचकोकण दौऱ्यात सर्व ठिकाणी मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक्स आणि होम स्टे (निवास न्याहरी योजना) यावर भर दिला. सीआरझेडमध्ये काही प्रमाणात शिथिलता गरजेची आहे. ती मिळाल्यानंतर बीच शॅक्सची उभारणी शक्य आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपला प्रस्ताव तयार करून दिला आहे. त्यावर दोन महिन्यांत निर्णय अपेक्षित आहे.पर्यटन बारमाही नाही, उद्योगाची जोड हवीचकेवळ पर्यटनातून जिल्ह्याचा विकास शक्य आहे. मात्र त्यात खूप अडचणी आहेत. अतिवृष्टी, पुरामुळे पावसाळ्यात पर्यटक कोकणात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन हा बारमाही व्यवसाय होत नाही. त्याला उद्योगांची जोड गरजेची आहे.होम स्टे पॉलिसी

  • कोकणात येणाऱ्या पर्यटकांना घरगुती वातावरणात राहता यावे आणि स्थानिकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून निवास न्याहरी (होम स्टे) योजना राबवली जाते.
  • ज्या लोकांनी पर्यटकांची आपल्या घरी व्यवस्था केली आहे, त्यांना काही कर भरावे लागतात, त्यांना वीज बिल वाणिज्य स्वरुपाचे येते. त्यासाठी त्याचे एक धोरण निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
  • असा व्यवसाय करणार्यांना काही सवलती दिल्या जाणार आहेत. तसे झाल्यास हा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढेल. थोडक्यात स्थानिकांना हक्काचे काम मिळेल.

मंत्री उदय सामंत यांचा विशेष पुढाकारबीच शॅक्सबाबत मंत्री उदय सामंत गेला बराच काळ पाठपुरावा करत आहेत. गोव्याकडे जाणार्या पर्यटकांची पावले रत्नागिरी जिल्ह्यातच थांबवण्यासाठी गोव्यासारख्या योजना राबवणे गरजेचे आहे, हे ओळखून ते सतत बीच शॅक्सबाबत पाठपुरावा करत आहेत. त्यातून ती योजना आकाराला येत आहे. अर्थात अंमबजावणीकडे त्यांना विशेष लक्ष द्यावे लागेल, हे निश्चित.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरे