शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

चारचाकीसाठी जागा पुरेना, बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 13:49 IST

Trafic Ratnagiri-रत्नागिरी शहरात नागरिकांच्या संख्येबरोबरच वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे पार्किंग समस्येबरोबरच अपघातालाही निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे आता शहर वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही चालक अजूनही रस्त्यावरच गाड्या लावून इतरत्र जात आहेत.

ठळक मुद्देवाहने रस्त्यावर लावण्याचे प्रकार वाढलेशहर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा

रत्नागिरी : शहरात नागरिकांच्या संख्येबरोबरच वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे पार्किंग समस्येबरोबरच अपघातालाही निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे आता शहर वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही चालक अजूनही रस्त्यावरच गाड्या लावून इतरत्र जात आहेत.सध्या प्रत्येक घरात किमान एक दुचाकी असे प्रमाण झाले आहे. काही घरांमध्ये तर प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र दुचाकी वापरते. याचबरोबर आता मध्यमवर्गीय सर्रास चारचाकीचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत.

रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारूती मंदिर, माळ नाका, राम आळी, गोखले नाका, धनजी नाका या भागात अनेक दुकानांसमोर नो पार्किंगचे फलक समोर लावलेले असतानाही नागरिक आपल्या दुचाकी, चारचाकी गाड्या रस्त्यावरच लावून इतरत्र जातात. त्यामुळे वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होत असून, यामुळे वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो.शहरात अनेक भागात नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकासमोर किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी गाडी लावल्यास शहर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. अशा वाहनचालकांकडून २०० रूपयांच्या दंडाची वसुली केली जाते. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मारूती मंदिर येथे नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेने सुसज्ज अशी चारचाकी आणि दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने वाहतुकीला शिस्त लागत आहे.गोखले नाका, धनजी नाका सर्वात त्रासदायकशहरातील गोखले नाका, धनजी नाका या भागात सकाळी तसेच सायंकाळच्या वेळी वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. बरेचदा सिग्नल यंत्रणा बंद असल्याने एकाच पोलिसाला नियंत्रण करावे लागते. दुपारच्या वेळेत पोलीस नसल्याने मात्र राम आळी, गोखले नाका, धनजी नाका येथे दुचाकींबरोबरच मोठी वाहनेही वाट्टेल तिथे थांबवली जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.कारवाईला प्रारंभचालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. नो पार्किंगचा फलक समोर दिसत असूनही त्याच्यासमोरच गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याबरोबरच काही वेळा अपघात घडतात. त्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने आणि त्यांच्या टीमने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई सुरू आहे. गेल्यावर्षी १४,६४६ जणांकडून २९ लाख २८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRatnagiriरत्नागिरी