शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

चारचाकीसाठी जागा पुरेना, बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 13:49 IST

Trafic Ratnagiri-रत्नागिरी शहरात नागरिकांच्या संख्येबरोबरच वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे पार्किंग समस्येबरोबरच अपघातालाही निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे आता शहर वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही चालक अजूनही रस्त्यावरच गाड्या लावून इतरत्र जात आहेत.

ठळक मुद्देवाहने रस्त्यावर लावण्याचे प्रकार वाढलेशहर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा

रत्नागिरी : शहरात नागरिकांच्या संख्येबरोबरच वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे पार्किंग समस्येबरोबरच अपघातालाही निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे आता शहर वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही चालक अजूनही रस्त्यावरच गाड्या लावून इतरत्र जात आहेत.सध्या प्रत्येक घरात किमान एक दुचाकी असे प्रमाण झाले आहे. काही घरांमध्ये तर प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र दुचाकी वापरते. याचबरोबर आता मध्यमवर्गीय सर्रास चारचाकीचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत.

रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारूती मंदिर, माळ नाका, राम आळी, गोखले नाका, धनजी नाका या भागात अनेक दुकानांसमोर नो पार्किंगचे फलक समोर लावलेले असतानाही नागरिक आपल्या दुचाकी, चारचाकी गाड्या रस्त्यावरच लावून इतरत्र जातात. त्यामुळे वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होत असून, यामुळे वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो.शहरात अनेक भागात नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकासमोर किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी गाडी लावल्यास शहर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. अशा वाहनचालकांकडून २०० रूपयांच्या दंडाची वसुली केली जाते. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मारूती मंदिर येथे नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेने सुसज्ज अशी चारचाकी आणि दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने वाहतुकीला शिस्त लागत आहे.गोखले नाका, धनजी नाका सर्वात त्रासदायकशहरातील गोखले नाका, धनजी नाका या भागात सकाळी तसेच सायंकाळच्या वेळी वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. बरेचदा सिग्नल यंत्रणा बंद असल्याने एकाच पोलिसाला नियंत्रण करावे लागते. दुपारच्या वेळेत पोलीस नसल्याने मात्र राम आळी, गोखले नाका, धनजी नाका येथे दुचाकींबरोबरच मोठी वाहनेही वाट्टेल तिथे थांबवली जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.कारवाईला प्रारंभचालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. नो पार्किंगचा फलक समोर दिसत असूनही त्याच्यासमोरच गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याबरोबरच काही वेळा अपघात घडतात. त्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने आणि त्यांच्या टीमने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई सुरू आहे. गेल्यावर्षी १४,६४६ जणांकडून २९ लाख २८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRatnagiriरत्नागिरी