शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान किसान पेन्शन योजनेत बोगस लाभार्थी, अपात्र शेतकऱ्यांकडून 'इतक्या' कोटीची वसुली अजूनही बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 16:22 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा लाभ आयकर ...

शोभना कांबळेरत्नागिरी : शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा लाभ आयकर दाते तसेच निकषात न बसणाऱ्या व्यक्तींनी घेतल्याचे निदर्शनास आल्याने घेतलेला लाभ परत करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. अशा अपात्र ४०२० शेतकऱ्यांकडून आतापर्यंत एक कोटी एक लाख ३२ हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली असून, सुमारे दीड कोटीची वसुली अजूनही बाकी आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन तीन टप्प्यांत दिली जात आहे. जिल्ह्यात या योजनेचे २ लाख ५७ हजार ९९९ एवढे लाभार्थी आहेत. मात्र, या योजनेचा लाभ केवळ अल्पभूधारक तसेच ज्यांचे उत्पन्न १० हजारांच्या आत आहे, अशांना देण्यात येतो.

असे असतानाही या योजनेचा लाभ आयकर भरणारे तसेच नवरा - बायको दोघेही नोकरीला असणाऱ्यांकडून घेण्यात आला होता. आधार कार्ड लिंक असल्याने शासनाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे अशा अपात्र शेतकऱ्यांवर कारवाई करून त्यांना देण्यात आलेली रक्कम परत करण्यासंदर्भातील आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. देशभरातील अशा अपात्र शेतकऱ्यांची यादी आणि त्यांनी भरावयाच्या रकमेसह यादी सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली होती.

त्यानुसार अशा अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यासंदर्भात प्रत्येक तालुक्यात कारवाई सुरू झाली आहे. पोर्टलद्वारे ही पैसे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वर्षभरात केवळ सव्वा काेटीची वसुली

- आयकर भरलेले तसेच अन्य कारणाने अपात्र शेतकऱ्यांकडून पेन्शन परत घेण्याची कारवाई

- जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या ४०२० शेतकऱ्यांपैकी १५१० शेतकऱ्यांनी १ कोटी २० लाख ७२ हजार एवढा भरणा केला आहे.

- उर्वरित २५१० अपात्र शेतकऱ्यांकडून १ कोटी ५२ लाख ३२ हजार रुपयांचा भरणा व्हायचा असून, सध्या ही प्रक्रिया सुरू आहे.

४९८ शेतकऱ्यांना लाभ नाही

- जिल्ह्यातील आयकर भरलेल्या ४०२० शेतकऱ्यांपैकी ३५२२ शेतकऱ्यांनी घेतला लाभ.

- ३५२२ शेतकऱ्यांना मिळाला पहिल्या हप्त्याचा लाभ

- ४९८ जणांना लाभ मिळाला नाही

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPensionनिवृत्ती वेतनPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना