शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

नाकाबंदीच्या काळात ४०,८५० वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:26 IST

रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले आहे. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण ५७ ठिकाणी नाकांबदी ...

रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले आहे. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण ५७ ठिकाणी नाकांबदी केलेली आहे. १५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत ४०,८५० वाहनांवर कारवाई करण्यात आली.

नाकांबदीच्या ठिकाणी एकूण वाहने २९,३४९ एवढी वाहने तपासली. तसेच नाकाबंदीच्या काळात वाहनामधील ५१,८९२ एवढी लोकांची तपासणी केली. मोटार वाहन कायदा अंतर्गत एकूण ४०,८५० एवढ्या केसेस केल्या व त्यातून १,०६,१०,७०० एवढा दंड वसूल केला. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध ४,६८१ एवढ्या केसेस केल्या, तर त्यांच्याकडून दंड २१,९८,४०० इतका दंड वसूल केला. जिल्ह्यात जप्त केलेली वाहने ७ एवढी आहेत. कोविडच्या अनुषंगाने दाखल केलेल्या गुन्ह्याची संख्या ७९, तर विनाकारण फिरत असलेल्या २५७५ अशा नागरिकांची अँटिजेन चाचणी केली. त्यामध्ये १८३ नागरिक पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.