शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘अ‍ॅसिड रेन’च्या अफवेने लांजात पळापळ

By admin | Updated: April 17, 2015 00:04 IST

प्रशासनाची धावपळ : रेल्वे प्रशासनाच्या अस्वच्छतेचे कारण उघड

लांजा : तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशनच्या परिसरात ‘केमिकल रेन’ पडल्याची अफवा संपूर्ण लांजात पसरताच प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या अस्वच्छतेमुळेच पडलेल्या पावसाचे पाणी गटारातून वाहात असताना फेसाळले, असा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे.गुरुवारी दुपारी ३ वाजता लांजा तालुक्यात सर्वत्र वादळी वाऱ्याचा फटका बसला. त्याचप्रमाणे विलवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणीदेखील मुसळधार पाऊस कोसळला. पावसाचे पाणी रेल्वे ट्रकच्या शेजारी असणाऱ्या गटारातून वाहत असताना रेल्वे ट्रॅकवर असणारे रसायन या पाण्यात मिसळल्याने संपूर्ण गटाराच्या पाण्यावर फेसाळेला तवंग तयार झाला. अनेकांनी या गटाराच्या पाण्यावरील फोटो काढून व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवले व विलवडे रेल्वे स्टेशन येथे केमिकलचा पाऊस पडल्याची अफवा उठवली. तत्काळ लांजा तहसीलदार दशरथ चौधरी यांनी तलाठ्यांमार्फत पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यावेळी संपूर्ण गावात अशा प्रकारे कुठेच पाऊस पडला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले व फक्त रेल्वे स्टेशनच्या गटारापुरताच केमिकलचा पाऊस पडला का? असा सवाल केला. रेल्वे स्टेशन येथे असणारी अस्वच्छता रेल्वे थांबल्यानंतर पडणारे रसायन यामुळे आज पडलेल्या पावसामुळे हे रसायन रेल्वे स्थानकाच्या गटारात पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले आणि ज्या गटारामध्ये वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यावर पांढरा फेसाळ असा तवंग निर्माण झाला. याचे आश्चर्य येथील रेल्वे कर्मचाऱ्यांना वाटले. मात्र, आपल्या स्टेशनच्या अस्वच्छतेमुळे असा प्रकार घडल्याचे त्यांच्या उशिरा लक्षात आले. तोपर्यंत शासकीय यंत्रणेने ही अफवा असल्याचे म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाने अस्वच्छतेच्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी हा प्रयत्न चालू केला आहे, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. (प्रतिनिधी)रेल्वे ट्रकवरील रसायनयुक्त पाणी गटारातून वाहात आल्याचा फोटो व्हॉटस्अपवरून फिरला आणि अफवा पसरली.तहसीलदार दशरथ चौधरी यांनीही घेतली घटनास्थळी धाव.तहसीलदारांनी केला खुलासा.