शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

सरकारच्या तिजोरीत १० कोटींची भर

By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST

गौण खनिज वसुली : वसुलीमध्ये मंडणगड तालुका अव्वल

रत्नागिरी : गौण खनिज बंदी उठवण्यात आल्याने जिल्ह्याच्या महसूलातही वाढ झाली आहे. खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज वसुलीपोटी आॅगस्टअखेर तब्बल १० कोटी ४७ लाख इतकी वसुली करून जिल्ह्याच्या तिजोरीत भर टाकली आहे. जिल्हा खनिकर्म विभागाला गौण खनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज फी व भूपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्यासाठी एकूण ३६ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पाच उपविभाग आणि तहसील स्तरावरही उद्दिष्ट देण्यात आल्याने जिल्ह्यासाठी यावर्षी ४६ कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचा मानस जिल्हा कार्यालयाने ठेवला आहे. एप्रिल ते आॅगस्ट २०१५ या पाच महिन्यात दिलेल्या उद्दिष्टापैकी केलेल्या वसुलीत मंडणगड तालुक्याने अव्वल स्थान राखले आहे. (५३ लाख १८ हजार रूपये), त्याखालोखाल वसुली खेड तालुक्याची झाली आहे. सर्वात कमी वसुली राजापूर (७ लाख २२ हजार), संगमेश्वर (१४ लाख २५ हजार), लांजा (१४ लाख १९ हजार) इतकी झाली आहे. उपविभागात राजापूरने बाजी मारली असून, १ कोटी ६४ लाखांची वसुली केली आहे. त्याखालोखाल खेड उपविभागाची वसुली ४६ लाख रूपये इतकी झाली आहे. गौण खनिजांवरील बंदी उठल्यानंतर सर्वच तालुक्यांनी जोर लावलेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील राजापूर, चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली या पाच उपविभागांनी तसेच नऊ तहसील कार्यालयांनी मिळून आॅगस्टअखेर एकूण १० कोटी ४६ लाख ९८ हजार इतकी वसुली केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही धडक कामगिरी करत आॅगस्टअखेर ४ कोटी ४६ लाख ५४ हजार एवढी वसुली केली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास सात महिने शिल्लक असल्याने या कालावधीत उद्दिष्टापेक्षाही अधिक वसुली करण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)