शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार, कोकणात आढळतात गरम पाण्याचे झरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 18:33 IST

- महेश कदम, रत्नागिरी कोकण भूमीत आढळणारे गरम पाण्याचे झरे म्हणजे, निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार आहे. याची निर्मिती हजारो ...

- महेश कदम,रत्नागिरीकोकण भूमीत आढळणारे गरम पाण्याचे झरे म्हणजे, निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार आहे. याची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी झाली. यात स्नान केल्याने त्वचारोग बरे होणे अथवा पाप नष्ट होते अशी लोकांची श्रद्धा आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी या स्थळी मंदिराची उभारणी झाल्याचे दिसते. त्यामुळे तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आरवली, राजवाडी, तुरळ, उन्हाळे याठिकाणी अशा प्रकारचे गरम पाण्याचे झरे आहेत. आजच्या युगातही मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक येथे भेट देऊन, स्नानाचा आनंद लुटतात.सन १६६८ यावर्षी राजापुरात फ्रेंच वखार स्थापन झाली. डेलाॅन नावाचा फ्रेंच प्रवासी सन १६७० मध्ये राजापुरात आला होता. तो आपल्या प्रवास वृत्तात म्हणतो, ‘‘फ्रेंचांनी नुकतीच येथे वखार घातली असून, जवळच एक सुंदर घर बांधले आहे. तेथे मोठ्या कारंजाशेजारी मोठी बाग आहे. त्या कारंज्यातून गरम पाण्याचा झरा वाहतो. युरोपातील कुठल्याही कारंजापेक्षा तो कमी प्रतीचा नाही.’’ यात डेलाॅनने उल्लेखिला गरम पाण्याचा झरा ‘उन्हाळे’ येथील आहे. अर्जुना नदीच्या मुख्य प्रवाहातिरी, फ्रेंचांची वखार होती. परंतु, सध्या ती पूर्णपणे नष्ट झाली असून, तिचे काहीच अवशेष शिल्लक नाहीत.दुसरी नोंद ‘बार्थलेमी ॲबे कॅरे’ या फ्रेंच प्रवाशाने आपल्या ‘The Travel Of In India And The Near East १६७२ To १६७४’ म्हणजे ‘भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास’ या ग्रंथात नोंदवली आहे. सुरत ते गोवा असा कॅरेचा प्रवास, बहुतांशी हिंदवी स्वराज्याच्या मुलूखातून झाला. त्याच्याजवळ मराठ्यांची दस्तके म्हणजे परवाना असल्याने, मार्गात कुठेच अडचण भासली नाही. तो लिहितो, ‘‘१३ डिसेंबर १६७२ रोजी दुपारी, आम्ही एका टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. येथे लोकांची गर्दी असून, यात स्त्रियाही होत्या, माझ्या एका सहकाऱ्याने सांगितलं की, हे एक हिंदूंचे पवित्र धार्मिक क्षेत्र आहे. याठिकाणी असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्यासाठी अनेक भाविक येत असतात. यात स्नान केल्याने, सर्व पाप आणि असाध्य आजार बरे होतात. माझ्या सोबत असलेले मजूर व भोई श्रद्धाळू होते. त्यांनाही तेथे स्थान करण्याची इच्छा झाल्याने, मी त्यांना तशी परवानगी दिली. याठिकाणी पाण्याची दोन कुंडे असून, एकातील पाणी उकळल्यासारख गरम होत, तर दुसऱ्यातील पाणी अगदीच थंड आहे.’’वर उल्लेख केलेला गरम पाण्याचा झरा, संगमेश्वर जवळ असल्याचे ॲबे कॅरे सांगतो. संगमेश्वरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर, राजवाडी गावाजवळील रामेश्वर मंदिराजवळ गरम पाण्याचा झरा आहे. या मंदिराचे बांधकाम व रचना पाहता, सुमारे तीन शतकापूर्वी याची निर्मिती झाल्याचे अनुमान होते. तसेच तुरळ गावाजवळ अजून एक गरम पाण्याचा झरा असून, लगतच हेमाडपंथी रचनेचे एक प्राचीन शिवमंदिर, सध्याही पडझड झालेल्या अवस्थेत आहे. कॅरेने आपल्या प्रवास वृत्तात वर्णीत केलेला गरम पाण्याचा झरा, वर सांगितलेल्या दोन ठिकाणातील एक असावा असे वाटते.

  • गरम पाण्याच्या झऱ्या संदर्भात, ऐतद्देशीय साधनात जास्त उल्लेख सापडत नाही, परंतु काही परकीय प्रवाशांच्या, भारतातील प्रवास वर्णनात अशी नोंद आढळते.
  • शिवकालात कोकणातील सागरी व्यापार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया होता. परकीय सत्तांनी समुद्रकिनारी व अंतर्गत भागात खाडीवर आपली व्यापारी केंद्रे म्हणजेच ‘वखारी’ उघडल्या.
  • याचे प्रमुख कारण म्हणजे सुरतेपेक्षा, कोकणातील बंदरात माल स्वस्त मिळत असे. हे परकीय प्रवासी आपल्या सोबत वखारींची पत्रेही ने-आण करीत, त्यामुळे त्यांचा मुक्काम वखारीत होई. अशाच काही फ्रेंच प्रवाशांनी आपल्या कोकण प्रवासात गरम पाण्याच्या झऱ्याविषयी लिहून ठेवले आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी