शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार, कोकणात आढळतात गरम पाण्याचे झरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 18:33 IST

- महेश कदम, रत्नागिरी कोकण भूमीत आढळणारे गरम पाण्याचे झरे म्हणजे, निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार आहे. याची निर्मिती हजारो ...

- महेश कदम,रत्नागिरीकोकण भूमीत आढळणारे गरम पाण्याचे झरे म्हणजे, निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार आहे. याची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी झाली. यात स्नान केल्याने त्वचारोग बरे होणे अथवा पाप नष्ट होते अशी लोकांची श्रद्धा आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी या स्थळी मंदिराची उभारणी झाल्याचे दिसते. त्यामुळे तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आरवली, राजवाडी, तुरळ, उन्हाळे याठिकाणी अशा प्रकारचे गरम पाण्याचे झरे आहेत. आजच्या युगातही मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक येथे भेट देऊन, स्नानाचा आनंद लुटतात.सन १६६८ यावर्षी राजापुरात फ्रेंच वखार स्थापन झाली. डेलाॅन नावाचा फ्रेंच प्रवासी सन १६७० मध्ये राजापुरात आला होता. तो आपल्या प्रवास वृत्तात म्हणतो, ‘‘फ्रेंचांनी नुकतीच येथे वखार घातली असून, जवळच एक सुंदर घर बांधले आहे. तेथे मोठ्या कारंजाशेजारी मोठी बाग आहे. त्या कारंज्यातून गरम पाण्याचा झरा वाहतो. युरोपातील कुठल्याही कारंजापेक्षा तो कमी प्रतीचा नाही.’’ यात डेलाॅनने उल्लेखिला गरम पाण्याचा झरा ‘उन्हाळे’ येथील आहे. अर्जुना नदीच्या मुख्य प्रवाहातिरी, फ्रेंचांची वखार होती. परंतु, सध्या ती पूर्णपणे नष्ट झाली असून, तिचे काहीच अवशेष शिल्लक नाहीत.दुसरी नोंद ‘बार्थलेमी ॲबे कॅरे’ या फ्रेंच प्रवाशाने आपल्या ‘The Travel Of In India And The Near East १६७२ To १६७४’ म्हणजे ‘भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास’ या ग्रंथात नोंदवली आहे. सुरत ते गोवा असा कॅरेचा प्रवास, बहुतांशी हिंदवी स्वराज्याच्या मुलूखातून झाला. त्याच्याजवळ मराठ्यांची दस्तके म्हणजे परवाना असल्याने, मार्गात कुठेच अडचण भासली नाही. तो लिहितो, ‘‘१३ डिसेंबर १६७२ रोजी दुपारी, आम्ही एका टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. येथे लोकांची गर्दी असून, यात स्त्रियाही होत्या, माझ्या एका सहकाऱ्याने सांगितलं की, हे एक हिंदूंचे पवित्र धार्मिक क्षेत्र आहे. याठिकाणी असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्यासाठी अनेक भाविक येत असतात. यात स्नान केल्याने, सर्व पाप आणि असाध्य आजार बरे होतात. माझ्या सोबत असलेले मजूर व भोई श्रद्धाळू होते. त्यांनाही तेथे स्थान करण्याची इच्छा झाल्याने, मी त्यांना तशी परवानगी दिली. याठिकाणी पाण्याची दोन कुंडे असून, एकातील पाणी उकळल्यासारख गरम होत, तर दुसऱ्यातील पाणी अगदीच थंड आहे.’’वर उल्लेख केलेला गरम पाण्याचा झरा, संगमेश्वर जवळ असल्याचे ॲबे कॅरे सांगतो. संगमेश्वरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर, राजवाडी गावाजवळील रामेश्वर मंदिराजवळ गरम पाण्याचा झरा आहे. या मंदिराचे बांधकाम व रचना पाहता, सुमारे तीन शतकापूर्वी याची निर्मिती झाल्याचे अनुमान होते. तसेच तुरळ गावाजवळ अजून एक गरम पाण्याचा झरा असून, लगतच हेमाडपंथी रचनेचे एक प्राचीन शिवमंदिर, सध्याही पडझड झालेल्या अवस्थेत आहे. कॅरेने आपल्या प्रवास वृत्तात वर्णीत केलेला गरम पाण्याचा झरा, वर सांगितलेल्या दोन ठिकाणातील एक असावा असे वाटते.

  • गरम पाण्याच्या झऱ्या संदर्भात, ऐतद्देशीय साधनात जास्त उल्लेख सापडत नाही, परंतु काही परकीय प्रवाशांच्या, भारतातील प्रवास वर्णनात अशी नोंद आढळते.
  • शिवकालात कोकणातील सागरी व्यापार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया होता. परकीय सत्तांनी समुद्रकिनारी व अंतर्गत भागात खाडीवर आपली व्यापारी केंद्रे म्हणजेच ‘वखारी’ उघडल्या.
  • याचे प्रमुख कारण म्हणजे सुरतेपेक्षा, कोकणातील बंदरात माल स्वस्त मिळत असे. हे परकीय प्रवासी आपल्या सोबत वखारींची पत्रेही ने-आण करीत, त्यामुळे त्यांचा मुक्काम वखारीत होई. अशाच काही फ्रेंच प्रवाशांनी आपल्या कोकण प्रवासात गरम पाण्याच्या झऱ्याविषयी लिहून ठेवले आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी