शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Ratnagiri: बंदी उठून महिना लोटला; मासेमारीची जाळी रिकामीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 18:07 IST

आर्थिक तंगीमुळे कुणाकडे खलाशी, नौका दुरुस्त नाहीत

रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदी उठल्यानंतर मासेमारी सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप पूर्ण मासेमारी सुरू झालेली नाही. आगावू रकमा देऊन खलाशी आणणे अनेक मच्छीमारांना शक्य झालेले नाही. मासेमारीपूर्वी नौकांची देखभाल दुरुस्ती करणारी कारागीर मंडळी मिरकरवाडा बंदर सोडून दुसऱ्या जिल्ह्यातील बंदरांवर कामांसाठी गेल्याने अनेक नौकांच्या देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. त्यातच कमी प्रमाणात मिळणारी मासळी आणि वाढलेले खर्च यामुळे ५० ते ६० टक्के नौकाच मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत.मासळीचे प्रमाण कमी?पावसाळी मासेमारी बंदी १ ऑगस्टला संपली आणि मासेमारी सुरू झाली. मात्र महिना झाला तरी रत्नागिरीतील सर्व नौका मासेमारीसाठी जाऊ शकल्या नाहीत. ज्या नौका मासेमारीसाठी जात आहेत, त्यांनाही फारशी मासळी मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेही काही नौकामालकांनी समुद्रात न जाणेच पसंत केले आहे. जे मासेमारीसाठी जात आहेत, त्यातील १० ते १२ टक्के लोकांनाच मासळी मिळत आहे. बाकी नौकांची स्थिती बिकट झाली आहे.

खलाशी आणायला पैसे नाहीत१ ऑगस्टपासून नियमित मासेमारी आणि १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाली आहे. त्यांच्या नौका मोठ्या असल्याने त्यावर अधिक खलाशी असतात. स्थानिक पातळीवर खलाशी मिळत नसल्याने ते परप्रांतातून आणावे लागतात. मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी आगावू रकमा देऊन त्यांना आणले जाते. मागील मासेमारी हंगाम बहुसंख्य मच्छीमारांसाठी तोट्याचा गेला. त्यामुळे नव्या हंगामासाठी खलाशांना आगावू देण्यासाठीची रक्कम नौकामालकांकडे नाही. खलाशी उपलब्ध नाहीत म्हणूनही काही नौका मासेमारीसाठी गेलेल्या नाहीत.

कारागीरही गेले सोडूनरत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात नौकांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करणारे कारागीर येथे पुरेसे काम नसल्याने जिल्ह्याबाहेरच्या बंदरांवर कामे मिळतील, या आशेने गेले आहेत. यामध्ये जाळी विणणे, जाळी शिवणे, नौकांच्या फळ्या बदलणे, इंजिन दुरुस्त करणे आदी कामांचा समावेश आहे. हे कारागीर जिल्ह्याबाहेर गेल्याने अनेक नौकांची दुरुस्ती झालेली नाही. या नौकासुद्धा मिरकरवाडा व अन्य बंदरातच उभ्या आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याचे दिसून येत नाही.

पाऊस नसल्याने..

दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या तारखेला पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते तेव्हा वारा, पाऊस असतो. या वातावरणामुळे दूरवरच्या खोल समुद्रातील मासे किनाऱ्याच्या जवळपास येतात. त्यामुळे काही प्रमाणात मासळी जाळ्यात सापडते. परंतु यावर्षी पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन तीन दिवस झाले तरी वारा, पाऊस नसल्याने अपेक्षित मासळी मिळू लागली नसल्याचे सांगण्यात आले.डिझेलसाठीही पैसे अपुरेपर्ससीन नेटचा वापर करणारे मच्छीमार आठवडाभराचे डिझेलसोबत घेऊन समुद्रात जातात. त्याच्या अनुदानाचा परतावा त्यांना सरकारकडून मिळतो. पण सध्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक मच्छीमार चार-पाच दिवसांचाच डिझेल साठा घेऊन समुद्रात जात आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार