शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: बंदी उठून महिना लोटला; मासेमारीची जाळी रिकामीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 18:07 IST

आर्थिक तंगीमुळे कुणाकडे खलाशी, नौका दुरुस्त नाहीत

रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदी उठल्यानंतर मासेमारी सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप पूर्ण मासेमारी सुरू झालेली नाही. आगावू रकमा देऊन खलाशी आणणे अनेक मच्छीमारांना शक्य झालेले नाही. मासेमारीपूर्वी नौकांची देखभाल दुरुस्ती करणारी कारागीर मंडळी मिरकरवाडा बंदर सोडून दुसऱ्या जिल्ह्यातील बंदरांवर कामांसाठी गेल्याने अनेक नौकांच्या देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. त्यातच कमी प्रमाणात मिळणारी मासळी आणि वाढलेले खर्च यामुळे ५० ते ६० टक्के नौकाच मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत.मासळीचे प्रमाण कमी?पावसाळी मासेमारी बंदी १ ऑगस्टला संपली आणि मासेमारी सुरू झाली. मात्र महिना झाला तरी रत्नागिरीतील सर्व नौका मासेमारीसाठी जाऊ शकल्या नाहीत. ज्या नौका मासेमारीसाठी जात आहेत, त्यांनाही फारशी मासळी मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेही काही नौकामालकांनी समुद्रात न जाणेच पसंत केले आहे. जे मासेमारीसाठी जात आहेत, त्यातील १० ते १२ टक्के लोकांनाच मासळी मिळत आहे. बाकी नौकांची स्थिती बिकट झाली आहे.

खलाशी आणायला पैसे नाहीत१ ऑगस्टपासून नियमित मासेमारी आणि १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाली आहे. त्यांच्या नौका मोठ्या असल्याने त्यावर अधिक खलाशी असतात. स्थानिक पातळीवर खलाशी मिळत नसल्याने ते परप्रांतातून आणावे लागतात. मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी आगावू रकमा देऊन त्यांना आणले जाते. मागील मासेमारी हंगाम बहुसंख्य मच्छीमारांसाठी तोट्याचा गेला. त्यामुळे नव्या हंगामासाठी खलाशांना आगावू देण्यासाठीची रक्कम नौकामालकांकडे नाही. खलाशी उपलब्ध नाहीत म्हणूनही काही नौका मासेमारीसाठी गेलेल्या नाहीत.

कारागीरही गेले सोडूनरत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात नौकांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करणारे कारागीर येथे पुरेसे काम नसल्याने जिल्ह्याबाहेरच्या बंदरांवर कामे मिळतील, या आशेने गेले आहेत. यामध्ये जाळी विणणे, जाळी शिवणे, नौकांच्या फळ्या बदलणे, इंजिन दुरुस्त करणे आदी कामांचा समावेश आहे. हे कारागीर जिल्ह्याबाहेर गेल्याने अनेक नौकांची दुरुस्ती झालेली नाही. या नौकासुद्धा मिरकरवाडा व अन्य बंदरातच उभ्या आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याचे दिसून येत नाही.

पाऊस नसल्याने..

दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या तारखेला पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते तेव्हा वारा, पाऊस असतो. या वातावरणामुळे दूरवरच्या खोल समुद्रातील मासे किनाऱ्याच्या जवळपास येतात. त्यामुळे काही प्रमाणात मासळी जाळ्यात सापडते. परंतु यावर्षी पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन तीन दिवस झाले तरी वारा, पाऊस नसल्याने अपेक्षित मासळी मिळू लागली नसल्याचे सांगण्यात आले.डिझेलसाठीही पैसे अपुरेपर्ससीन नेटचा वापर करणारे मच्छीमार आठवडाभराचे डिझेलसोबत घेऊन समुद्रात जातात. त्याच्या अनुदानाचा परतावा त्यांना सरकारकडून मिळतो. पण सध्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक मच्छीमार चार-पाच दिवसांचाच डिझेल साठा घेऊन समुद्रात जात आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार