शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: बंदी उठून महिना लोटला; मासेमारीची जाळी रिकामीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 18:07 IST

आर्थिक तंगीमुळे कुणाकडे खलाशी, नौका दुरुस्त नाहीत

रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदी उठल्यानंतर मासेमारी सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप पूर्ण मासेमारी सुरू झालेली नाही. आगावू रकमा देऊन खलाशी आणणे अनेक मच्छीमारांना शक्य झालेले नाही. मासेमारीपूर्वी नौकांची देखभाल दुरुस्ती करणारी कारागीर मंडळी मिरकरवाडा बंदर सोडून दुसऱ्या जिल्ह्यातील बंदरांवर कामांसाठी गेल्याने अनेक नौकांच्या देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. त्यातच कमी प्रमाणात मिळणारी मासळी आणि वाढलेले खर्च यामुळे ५० ते ६० टक्के नौकाच मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत.मासळीचे प्रमाण कमी?पावसाळी मासेमारी बंदी १ ऑगस्टला संपली आणि मासेमारी सुरू झाली. मात्र महिना झाला तरी रत्नागिरीतील सर्व नौका मासेमारीसाठी जाऊ शकल्या नाहीत. ज्या नौका मासेमारीसाठी जात आहेत, त्यांनाही फारशी मासळी मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेही काही नौकामालकांनी समुद्रात न जाणेच पसंत केले आहे. जे मासेमारीसाठी जात आहेत, त्यातील १० ते १२ टक्के लोकांनाच मासळी मिळत आहे. बाकी नौकांची स्थिती बिकट झाली आहे.

खलाशी आणायला पैसे नाहीत१ ऑगस्टपासून नियमित मासेमारी आणि १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाली आहे. त्यांच्या नौका मोठ्या असल्याने त्यावर अधिक खलाशी असतात. स्थानिक पातळीवर खलाशी मिळत नसल्याने ते परप्रांतातून आणावे लागतात. मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी आगावू रकमा देऊन त्यांना आणले जाते. मागील मासेमारी हंगाम बहुसंख्य मच्छीमारांसाठी तोट्याचा गेला. त्यामुळे नव्या हंगामासाठी खलाशांना आगावू देण्यासाठीची रक्कम नौकामालकांकडे नाही. खलाशी उपलब्ध नाहीत म्हणूनही काही नौका मासेमारीसाठी गेलेल्या नाहीत.

कारागीरही गेले सोडूनरत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात नौकांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करणारे कारागीर येथे पुरेसे काम नसल्याने जिल्ह्याबाहेरच्या बंदरांवर कामे मिळतील, या आशेने गेले आहेत. यामध्ये जाळी विणणे, जाळी शिवणे, नौकांच्या फळ्या बदलणे, इंजिन दुरुस्त करणे आदी कामांचा समावेश आहे. हे कारागीर जिल्ह्याबाहेर गेल्याने अनेक नौकांची दुरुस्ती झालेली नाही. या नौकासुद्धा मिरकरवाडा व अन्य बंदरातच उभ्या आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याचे दिसून येत नाही.

पाऊस नसल्याने..

दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या तारखेला पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते तेव्हा वारा, पाऊस असतो. या वातावरणामुळे दूरवरच्या खोल समुद्रातील मासे किनाऱ्याच्या जवळपास येतात. त्यामुळे काही प्रमाणात मासळी जाळ्यात सापडते. परंतु यावर्षी पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन तीन दिवस झाले तरी वारा, पाऊस नसल्याने अपेक्षित मासळी मिळू लागली नसल्याचे सांगण्यात आले.डिझेलसाठीही पैसे अपुरेपर्ससीन नेटचा वापर करणारे मच्छीमार आठवडाभराचे डिझेलसोबत घेऊन समुद्रात जातात. त्याच्या अनुदानाचा परतावा त्यांना सरकारकडून मिळतो. पण सध्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक मच्छीमार चार-पाच दिवसांचाच डिझेल साठा घेऊन समुद्रात जात आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार