शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

९६ पर्यटन स्थळांच्या वाट्याला अच्छे दिन

By admin | Updated: September 19, 2015 23:54 IST

पर्यटन विकास : ६७०.५७ कोटींचा आराखडा शासनाकडे

रत्नागिरी : जिल्ह्यातील ९६ पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाकडून ६७०.५७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. यात रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक २२ पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रीय पुरूषांची स्मारके तसेच गडकिल्ले, मंदिरे जीर्ण झालेली आहेत. स्थळांना ऊर्जितावस्था मिळावी तसेच ही स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास पर्यटकांचा ओघ रत्नागिरी जिल्ह्याकडे वाढेल, या हेतूने ही पर्यटनस्थळे त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता जिल्ह्यातील या ९६ विविध स्थळांच्या विकासासाठी ६७०.५७ कोटी रूपयांचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. ही स्मारके, निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक ठेवा, सागरी सौंदर्य (बीच), धर्मस्थळे, धबधबे, उद्याने, गरम पाण्याचे कुंड आदी पर्यटनस्थळे विकसित झाल्यास जिल्ह्यातील पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील विविध महत्वाची ही ९६ पर्यटनस्थळे त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या निधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सर्वाधिक स्थळे रत्नागिरी तालुक्यात २२ असून, त्यासाठी प्रस्तावीत रक्कम १२७.४५ कोटी रूपये इतकी आहे. तसेच एकूण ६७०.५७ कोटींपैकी पहिल्या टप्प्यात ४२७.६९ कोटी रूपये तर दुसऱ्या टप्प्यात २४२.८८ कोटी रूपये मिळणे अपेक्षित आहे. हा आराखडा आता शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून या स्थळांना प्राधान्यक्रम ठरवून देण्यात येणार असून, त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर या पर्यटनस्थळांच्या विकासाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या दुर्लक्षित राहिलेल्या पर्यटनस्थळांना उर्जितावस्था प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी) सर्वाधिक स्थळे रत्नागिरीत या आराखड्यात रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक २२ पर्यटनस्थळांचा विचार करण्यात आला आहे. त्याखालोखाल चिपळूण (१६), दापोली (१३), संगमेश्वर (११), राजापूर (१०), खेड (९), गुहागर (८), मंडणगड (४), लांजा (३) येथील स्थळेही विकसीत करण्यात येणार आहेत. शासनाच्या कोकण पॅकेज अंतर्गत विशेष घटक योजनेतून आंबडवे (ता. मंडणगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी व शिल्पसृष्टीसाठी ५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील ५ स्मारके, २२ गडकिल्ले, ३८ मंदिरे, १० समुद्रकिनारे, ३ धबधबे, २ गरम पाण्याची कुंडे, एक उद्यान, तसेच अन्य पर्यटनस्थळांचा समावेश आहे. देवडे (ता. संगमेश्वर) या निसर्गरम्य गावाचा समावेश स्वतंत्ररित्या ‘इको टुरिझम’ मध्ये करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे येथील त्यांचे घर, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे कोट (लांजा) येथील घर, लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरीतील जन्मस्थळ तसेच विशेष कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बंदिवान करून ठेवण्यात आले होते ती खोली, मालगुंड येथील कवी केशवसुतांचे स्मारक तसेच रत्नागिरीत बाळासाहेब ठाकरे उद्यान आदींचा समावेश आहे.