शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

९६ पर्यटन स्थळांच्या वाट्याला अच्छे दिन

By admin | Updated: September 19, 2015 23:54 IST

पर्यटन विकास : ६७०.५७ कोटींचा आराखडा शासनाकडे

रत्नागिरी : जिल्ह्यातील ९६ पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाकडून ६७०.५७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. यात रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक २२ पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रीय पुरूषांची स्मारके तसेच गडकिल्ले, मंदिरे जीर्ण झालेली आहेत. स्थळांना ऊर्जितावस्था मिळावी तसेच ही स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास पर्यटकांचा ओघ रत्नागिरी जिल्ह्याकडे वाढेल, या हेतूने ही पर्यटनस्थळे त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता जिल्ह्यातील या ९६ विविध स्थळांच्या विकासासाठी ६७०.५७ कोटी रूपयांचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. ही स्मारके, निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक ठेवा, सागरी सौंदर्य (बीच), धर्मस्थळे, धबधबे, उद्याने, गरम पाण्याचे कुंड आदी पर्यटनस्थळे विकसित झाल्यास जिल्ह्यातील पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील विविध महत्वाची ही ९६ पर्यटनस्थळे त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या निधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सर्वाधिक स्थळे रत्नागिरी तालुक्यात २२ असून, त्यासाठी प्रस्तावीत रक्कम १२७.४५ कोटी रूपये इतकी आहे. तसेच एकूण ६७०.५७ कोटींपैकी पहिल्या टप्प्यात ४२७.६९ कोटी रूपये तर दुसऱ्या टप्प्यात २४२.८८ कोटी रूपये मिळणे अपेक्षित आहे. हा आराखडा आता शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून या स्थळांना प्राधान्यक्रम ठरवून देण्यात येणार असून, त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर या पर्यटनस्थळांच्या विकासाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या दुर्लक्षित राहिलेल्या पर्यटनस्थळांना उर्जितावस्था प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी) सर्वाधिक स्थळे रत्नागिरीत या आराखड्यात रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक २२ पर्यटनस्थळांचा विचार करण्यात आला आहे. त्याखालोखाल चिपळूण (१६), दापोली (१३), संगमेश्वर (११), राजापूर (१०), खेड (९), गुहागर (८), मंडणगड (४), लांजा (३) येथील स्थळेही विकसीत करण्यात येणार आहेत. शासनाच्या कोकण पॅकेज अंतर्गत विशेष घटक योजनेतून आंबडवे (ता. मंडणगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी व शिल्पसृष्टीसाठी ५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील ५ स्मारके, २२ गडकिल्ले, ३८ मंदिरे, १० समुद्रकिनारे, ३ धबधबे, २ गरम पाण्याची कुंडे, एक उद्यान, तसेच अन्य पर्यटनस्थळांचा समावेश आहे. देवडे (ता. संगमेश्वर) या निसर्गरम्य गावाचा समावेश स्वतंत्ररित्या ‘इको टुरिझम’ मध्ये करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे येथील त्यांचे घर, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे कोट (लांजा) येथील घर, लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरीतील जन्मस्थळ तसेच विशेष कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बंदिवान करून ठेवण्यात आले होते ती खोली, मालगुंड येथील कवी केशवसुतांचे स्मारक तसेच रत्नागिरीत बाळासाहेब ठाकरे उद्यान आदींचा समावेश आहे.