शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यात ९४ मुख्याध्यापक अतिरिक्त

By admin | Updated: September 11, 2015 00:46 IST

शिक्षणाचा अधिकार : कमी पटसंख्येच्या शाळांचे मुख्याध्यापकपद होणार रद्द

आनंद त्रिपाठी वाटूळ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित इत्यादी सर्व) शाळांमधील संरचनात्मक बदल आणि संचमान्यतेच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २८ आॅगस्ट २०१५ च्या परिपत्रकानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ९४ शाळांमधील मुख्याध्यापकांना त्यांचे पद गमावण्याची वेळ आली आहे. माध्यमिक शाळा (नववी, दहावी)मध्ये १००पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास मुख्याध्यापकांचे पद अनुज्ञेय असेल. सध्या अस्तित्त्वात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या नववी, दहावीमध्ये ९०पेक्षा कमी झाल्यास त्या शाळेचे मुख्याध्यापक पद रद्द होणार असल्याचे नव्याने जाहीर झालेल्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. या शासन निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ३८८ माध्यमिक शाळांपैकी ९४ माध्यमिक शाळांना मुख्याध्यापकांशिवाय शाळेचे कामकाज हाकावे लागणार आहे. या ९४ शाळांमध्ये सध्या कित्येक वर्षांपासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणारे मुख्याध्यापक अतिरिक्त ठरल्याने त्यांना सहाय्यक शिक्षक पदावर काम करावे लागणार आहे. हा शासन निर्णय येण्यापूर्वीच्या निकषाप्रमाणे मान्य झालेल्या मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळेमध्ये समायोजित करावे, त्या व्यवस्थापनाची दुसरी शाळा नसल्यास तालुक्यात वा पूर्ण जिल्ह्यात जिथे जागा रिक्त असेल तिथे समायोजित करावे, असा स्पष्ट उल्लेख परिपत्रकामध्ये आहे. मुख्याध्यापक पदावरून सहायक शिक्षकाच्या पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन संरक्षण देण्यात आले असून, त्यांना मुख्याध्यापक पदाचेच वेतन मिळणार आहे.