शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

जिल्ह्यात ९४ मुख्याध्यापक अतिरिक्त

By admin | Updated: September 11, 2015 00:46 IST

शिक्षणाचा अधिकार : कमी पटसंख्येच्या शाळांचे मुख्याध्यापकपद होणार रद्द

आनंद त्रिपाठी वाटूळ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित इत्यादी सर्व) शाळांमधील संरचनात्मक बदल आणि संचमान्यतेच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २८ आॅगस्ट २०१५ च्या परिपत्रकानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ९४ शाळांमधील मुख्याध्यापकांना त्यांचे पद गमावण्याची वेळ आली आहे. माध्यमिक शाळा (नववी, दहावी)मध्ये १००पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास मुख्याध्यापकांचे पद अनुज्ञेय असेल. सध्या अस्तित्त्वात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या नववी, दहावीमध्ये ९०पेक्षा कमी झाल्यास त्या शाळेचे मुख्याध्यापक पद रद्द होणार असल्याचे नव्याने जाहीर झालेल्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. या शासन निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ३८८ माध्यमिक शाळांपैकी ९४ माध्यमिक शाळांना मुख्याध्यापकांशिवाय शाळेचे कामकाज हाकावे लागणार आहे. या ९४ शाळांमध्ये सध्या कित्येक वर्षांपासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणारे मुख्याध्यापक अतिरिक्त ठरल्याने त्यांना सहाय्यक शिक्षक पदावर काम करावे लागणार आहे. हा शासन निर्णय येण्यापूर्वीच्या निकषाप्रमाणे मान्य झालेल्या मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळेमध्ये समायोजित करावे, त्या व्यवस्थापनाची दुसरी शाळा नसल्यास तालुक्यात वा पूर्ण जिल्ह्यात जिथे जागा रिक्त असेल तिथे समायोजित करावे, असा स्पष्ट उल्लेख परिपत्रकामध्ये आहे. मुख्याध्यापक पदावरून सहायक शिक्षकाच्या पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन संरक्षण देण्यात आले असून, त्यांना मुख्याध्यापक पदाचेच वेतन मिळणार आहे.