शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

गावखडी किनारी ८२ कासवांच्या पिलांची समुद्राकडे झेप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 16:57 IST

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथे ऑलिव्ह रिडले जातीची समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कासवाच्या घरट्यातून सोमवारी (२० ...

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथे ऑलिव्ह रिडले जातीची समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कासवाच्या घरट्यातून सोमवारी (२० मार्च) ८२ पिले बाहेर येत समुद्रात झेपावली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व राजापूरच्या तहसीलदार शीतल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पिले समुद्रात सोडण्यात आली.लांबलेला पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे यावर्षी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या विणीचा हंगाम काहीसा लांबला हाेता. त्यातूनही जिल्ह्यातील समुद्र किनारी कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. गावखडी येथे कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी कासवांची घरटी संरक्षित केली आहेत. काही दिवसांपूर्वी मंडणगड तालुक्यातील वेळास याठिकाणी ९ कासवे समुद्रात साेडण्यात आली हाेती. त्यानंतर आता गावखडी येथे ८२ कासवांची पिल्ले समुद्रात साेडण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी स्मिता पाटील, रत्नागिरी प्रादेशिक वन विभागाच्या वनक्षेत्रपाल प्रियंका लगड आणि कर्मचारी उपस्थित हाेते. तसेच रत्नागिरीतील कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई यांचे कर्मचारी, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे नीलेश बापट, गावखडी ग्रामपंचायतीचे सरपंच  मुरलीधर तोडणकर, कांदळवन सहव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष कांचन आंब्रे तसेच पर्यटक, निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गावखडी समुद्र किनाऱ्यावर कांदळवन प्रतिष्ठान, मुंबईतर्फे कांदळवन व गावातील जैवविविधतेबाबत माहिती फलक लावण्यात आले आहेत. या फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याहस्ते करण्यात आले. कांदळवन कक्षातर्फे गावात जनजागृतीही करण्यात येत आहे. त्याद्वारे कांदळवन संरक्षण आणि कासवांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ऑलिव्ह रिडले जातीच्या मादी कासवाने घरटे बनविल्यानंतर साधारण ५० ते ६० दिवसांनंतर पिले घरट्यातून बाहेर येण्यास सुरुवात होते. यावर्षी विणीचा हंगाम काहीसा लांबला असून, पिले बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यापर्यंत या अंड्यांमधून पिले समुद्रात झेपावतील. - प्रदीप डिंगणकर, कासवमित्र, गावखडी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी