शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गावखडी किनारी ८२ कासवांच्या पिलांची समुद्राकडे झेप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 16:57 IST

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथे ऑलिव्ह रिडले जातीची समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कासवाच्या घरट्यातून सोमवारी (२० ...

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथे ऑलिव्ह रिडले जातीची समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कासवाच्या घरट्यातून सोमवारी (२० मार्च) ८२ पिले बाहेर येत समुद्रात झेपावली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व राजापूरच्या तहसीलदार शीतल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पिले समुद्रात सोडण्यात आली.लांबलेला पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे यावर्षी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या विणीचा हंगाम काहीसा लांबला हाेता. त्यातूनही जिल्ह्यातील समुद्र किनारी कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. गावखडी येथे कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी कासवांची घरटी संरक्षित केली आहेत. काही दिवसांपूर्वी मंडणगड तालुक्यातील वेळास याठिकाणी ९ कासवे समुद्रात साेडण्यात आली हाेती. त्यानंतर आता गावखडी येथे ८२ कासवांची पिल्ले समुद्रात साेडण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी स्मिता पाटील, रत्नागिरी प्रादेशिक वन विभागाच्या वनक्षेत्रपाल प्रियंका लगड आणि कर्मचारी उपस्थित हाेते. तसेच रत्नागिरीतील कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई यांचे कर्मचारी, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे नीलेश बापट, गावखडी ग्रामपंचायतीचे सरपंच  मुरलीधर तोडणकर, कांदळवन सहव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष कांचन आंब्रे तसेच पर्यटक, निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गावखडी समुद्र किनाऱ्यावर कांदळवन प्रतिष्ठान, मुंबईतर्फे कांदळवन व गावातील जैवविविधतेबाबत माहिती फलक लावण्यात आले आहेत. या फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याहस्ते करण्यात आले. कांदळवन कक्षातर्फे गावात जनजागृतीही करण्यात येत आहे. त्याद्वारे कांदळवन संरक्षण आणि कासवांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ऑलिव्ह रिडले जातीच्या मादी कासवाने घरटे बनविल्यानंतर साधारण ५० ते ६० दिवसांनंतर पिले घरट्यातून बाहेर येण्यास सुरुवात होते. यावर्षी विणीचा हंगाम काहीसा लांबला असून, पिले बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यापर्यंत या अंड्यांमधून पिले समुद्रात झेपावतील. - प्रदीप डिंगणकर, कासवमित्र, गावखडी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी