शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सह्याद्री खाेऱ्यातील घरे प्रकाशमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 19:02 IST

आमच्या आयुष्यातील हा सोन्याचा दिवस आहे,’ अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या

पाचल : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सह्याद्रीच्या खाेऱ्यातील कार्जिडा (ता. राजापूर) गावातील ब्राह्मण देव खोरे येथील सहा घरांना महावितरणने वीज देऊन त्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. तब्ब्ल ७५ वर्षांनंतर घरात वीज आल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत दिवाळीच साजरी केली. डोंगरदऱ्यात अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या घरांना वीज पुरवठा करणाऱ्या पाचल महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता संदीप बंडगर यांचेही ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले. काजिर्डा गावात काही वर्षांपूर्वीच वीज आलेली आहे. मात्र, गावापासून पाच ते सहा किलाेमीटर अंतरावर डोंगरदऱ्यात ब्राह्मण देव खोरे हा भाग वसलेला आहे. अतिशय दुर्गम भाग असून, येथे सहा ते सात घरांची वस्ती आहे. गेले अनेक वर्षे हे ग्रामस्थ विजेपासून वंचित आहेत. घनदाट जंगल, रस्ता तसेच साधी पायवाटही नाही. अशा दुर्गम भागात वीजपुरवठा करण्याचे अनेकवेळा प्रयत्न निष्फळ ठरले.या दुर्गम भागातील घरांना वीजपुरवठा करणे महावितरणसमोर मोठे आव्हानच होते.  संदीप बंडगर यांनी या वस्तीचे तत्काळ सर्वेक्षण  करून प्रस्ताव सादर केला.१४ लाखांच्या या कामाला रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता यांनी मंजुरी दिली आणि कामही पूर्ण झाले. अखेर तब्बल ७५ वर्षांनंतर १ मे रोजी या घरात वीज आली आणि ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. या वस्तीला वीज पुरवठा करण्यासाठी गावातील ग्रामस्थ, जमीन मालक, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचेच सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने महावितरणने दुर्गम भागातील घरात वीज देऊन अनेक वर्षांची इच्छा पूर्ण केली.

...तुमच्यामुळेच घरी वीज आली‘साहेब आज तुमच्यामुळेच आमच्या घरी वीज आली. आज आमच्या आयुष्यातील हा सोन्याचा दिवस आहे,’ अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. कनिष्ठ अभियंता संदीप बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानताना ग्रामस्थांचे डाेळे पाणावले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीज