शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

Crime News राज्यात आतापर्यंत ९२ हजार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 18:02 IST

लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८३ हजार २९९ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा ६३३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

ठळक मुद्देकोविडसंदर्भात रत्नागिरी जिल्ह्यात ७५ गुन्हे दाखलसर्वाधिक गुन्हे पुणे शहरातसर्वात कमी अकोलामध्ये

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात दि. २२ मार्च ते ३ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९२ हजार १६१ गुन्हे दाखल झाले आहेत. तर १८ हजार २१६ व्यक्तींना अटक करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात आत्तापर्यंत ७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.ही माहिती मुंबईतील पोलीस विभागातर्फे प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. आत्तापर्यंत राज्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद पुणे शहरात झाली असून, १४ हजार ७५२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक कमी सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद अकोल्यामध्ये असून, त्याची संख्या ७२ आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८३ हजार २९९ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा ६३३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार २५५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ५१ हजार ८७४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १७५ घटनांची नोंद झाली असून, यात ६५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडीCrime Newsगुन्हेगारी