शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ६२७ ग्रामसेवक कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत गावपातळीवर कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक पार पडत आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींतील ६२७ ग्रामसेवक ...

रत्नागिरी : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत गावपातळीवर कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक पार पडत आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींतील ६२७ ग्रामसेवक कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यापासून ते ग्रामस्थांना लागणाऱ्या सोयीसुविधांसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी ग्रामसेवकांना शाब्बासकीची थाप दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगला परिणाम जिल्ह्यात जाणवत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्यावर नियंत्रण ठेवताना प्रशासनालाही कसरत करावी लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाडी-वस्तीवर झाला आहे. आरोग्य यंत्रणा पोचविण्यासाठी ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कोरोनाबाधितांचा शोध घेणे हा मुख्य उद्देश असून गृह भेटीतून प्रचार व प्रसारही केला जातोय. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा व ग्रामस्थ यांच्यात ग्रामसेवकांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरत आहे. लोकप्रतिनिधी, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्याबरोबरीने ग्रामसेवकही या पथकात काम करत आहेत.

गावात योजना राबविण्यात हीच यंत्रणा सर्वात महत्त्वाची ठरत आहे. आतापर्यंत होम आयसोलेशन, कंटेन्मेंट झोन बनविण्यापासून ते अगदी कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती शासनाकडे पाठविण्यापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुक्त गावे ठेवण्यासाठी ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. गावांसह बाजारपेठ परिसरात सॅनिटायझर, घरोघरी धान्य वाटप, परजिल्ह्यातून येणाऱ्या मजुरांना राहण्याची व्यवस्था अशा प्रकारची कामेही ग्रामसेवकांमार्फत सुरू आहेत.

---------------------------

ग्राम कृती दलाची भूमिका महत्त्वाची

जिल्हा दौऱ्याच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी गावपातळीवर सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामसेवकांसह ग्राम कृती दलांनी पहिल्या लाटेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याप्रमाणे सध्या माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नातून ही लाट थोपवण्यास मदत होईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.