शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

जिल्ह्यात ५०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आणखी १४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच २४ तासांत ५०८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच २४ तासांत ५०८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ३६ हजार ४४ झाली आहे तर १४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून एकूण १,२१७ जणांचा मृत्यू झाला आहेत. ३७८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने बरे झालेल्यांची संख्या ३१ हजार २८० झाली आहे.

जिल्ह्यात २,४७४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात आरटीपीसीआर चाचणीत २९६ रुग्ण तर अँटिजेन चाचणीत २१२ रुग्ण सापडले. त्यामध्ये दापोली तालुक्यात १, खेडमध्ये १३, गुहागरात ३, चिपळुणात २७, संगमेश्वरमध्ये ४३, रत्नागिरीत ६२, लांजात १३ आणि राजापुरात सर्वांत जास्त ९० रुग्ण आढळले तर रविवारी मंडणगडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. रुग्ण पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण १७.६९ टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोना मृतांचा आकडा वाढतच चालला असून रत्नागिरी तालुक्यात सर्वांत जास्त १४ पैकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला तर राजापूर, दापोली तालुक्यांमध्ये प्रत्येकी २ जणांचा आणि खेड, संगमेश्वर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्ण मृत झाला आहे. कोरोनाबाधित मृत्यूचे प्रमाण ३.३७ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.७८ टक्के आहे.