शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोकण कृषि विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 16:02 IST

राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या धर्तीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश महसूल व कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देकोकण कृषि विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण :चंद्रकांत पाटील राहुरीतील विद्यापीठाच्या धर्तीवर कोकणातील प्रकल्पग्रस्तांनाही न्याय देण्याची बैठकीत मागणी

रत्नागिरी : राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या धर्तीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश महसूल व कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिले आहेत.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासंदर्भात मंत्रालयात बुधवारी बैठक झाली. या बैठकीला राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, उपसचिव गावडे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले.महात्मा फुले विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के नोकऱ्या दिल्या जात आहेत. मात्र, कोकणामधील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न रखडला आहे. राहुरी येथील विद्यापीठाच्या धर्तीवर कोकणातील प्रकल्पग्रस्तांनाही न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार डावखरे यांनी केली. त्यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित निर्णय न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी दोन कृषी विद्यापीठांना वेगवेगळा न्याय होऊ शकत नाही, असे म्हणत कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.

या निर्देशांमुळे गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न वेगाने मार्गी लागणार आहे. विद्यापीठातील शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येकडेही आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी कृषिमंत्र्यांनी सचिवांना तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे विद्यापीठात लवकरच जादा शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.आंबेनळी अपघातात मृत्युमुखी कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून नोकरी मिळाली नसल्याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले.कुलगुरुपदासाठी शनिवारी मुलाखतकोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर लवकरात लवकर कुलगुरुंची निवड करण्याची मागणी आमदार डावखरे यांनी केली. त्यावेळी या पदांसाठी येत्या शनिवारी (ता. २३) मुलाखती होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यानंतर प्राधान्याने कुलगुरुपदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRatnagiriरत्नागिरी