शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोकण कृषि विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 16:02 IST

राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या धर्तीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश महसूल व कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देकोकण कृषि विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण :चंद्रकांत पाटील राहुरीतील विद्यापीठाच्या धर्तीवर कोकणातील प्रकल्पग्रस्तांनाही न्याय देण्याची बैठकीत मागणी

रत्नागिरी : राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या धर्तीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश महसूल व कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिले आहेत.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासंदर्भात मंत्रालयात बुधवारी बैठक झाली. या बैठकीला राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, उपसचिव गावडे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले.महात्मा फुले विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के नोकऱ्या दिल्या जात आहेत. मात्र, कोकणामधील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न रखडला आहे. राहुरी येथील विद्यापीठाच्या धर्तीवर कोकणातील प्रकल्पग्रस्तांनाही न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार डावखरे यांनी केली. त्यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित निर्णय न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी दोन कृषी विद्यापीठांना वेगवेगळा न्याय होऊ शकत नाही, असे म्हणत कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.

या निर्देशांमुळे गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न वेगाने मार्गी लागणार आहे. विद्यापीठातील शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येकडेही आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी कृषिमंत्र्यांनी सचिवांना तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे विद्यापीठात लवकरच जादा शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.आंबेनळी अपघातात मृत्युमुखी कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून नोकरी मिळाली नसल्याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले.कुलगुरुपदासाठी शनिवारी मुलाखतकोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर लवकरात लवकर कुलगुरुंची निवड करण्याची मागणी आमदार डावखरे यांनी केली. त्यावेळी या पदांसाठी येत्या शनिवारी (ता. २३) मुलाखती होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यानंतर प्राधान्याने कुलगुरुपदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRatnagiriरत्नागिरी