शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या ४५ जागा निवडून येतील, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा

By मनोज मुळ्ये | Updated: October 19, 2023 14:12 IST

..त्यामुळे दहशतवाद्यांचे किती समर्थन करायचे, हे शरद पवारांना कळायला हवे

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामांमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीमध्ये केला.भाजपच्या महाविजय २०२४ संकल्प यात्रेसाठी बावनकुळे रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौर्यावर आले आहेत. बुधवारी रायगड मतदार संघातील दौरा करुन ते रात्री रत्नागिरीत दाखल झाले. गुरुवारी सकाळी त्यांनी भाजपच्या वॉरियर्सशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने गेल्या नऊ वर्षात देशात अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. देशाला जगात सर्वोत्तम करण्यासाठी गेल्या नऊ वर्षात त्यांनी प्रयत्न केला आहे, त्यामुळेच देशातील लोकांना ते पुन्हा पंतप्रधान व्हावेसे वाटतात. आपण आतापर्यंत ३२ हजाराहून अधिक लोकांना भेटलो. त्यातील फक्त १३ लोक सोडून बाकी सर्वांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचेच नाव घेतले. राज्यातील ९० टक्के लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजप महायुतीचा उमेदवार ५१ टक्के मते घेऊन विजयी होईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे ते म्हणाले.प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ६० हजार घरांपर्यंत पोहोचण्याचा म्हणजेच या मतदार संघातील साडेतुन लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प वॉरियर्सच्या बैठकीत करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. मोदी यांच्या कार्यकाळातील योजना संपर्क ते समर्थन अशा अभियानातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. संपर्क करायचा आणि समर्थन मागायचे, अशी ही मोहीम आहे.शरद पवार यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेत पंतप्रधानांवर टीका केली आहे. मात्र दहशतवादी हल्ला काय असतो, हे शरद पवार यांना माहिती आहे. ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रावरही दहशतवादी हल्ले झाले. त्यामुळे दहशतवाद्यांचे किती समर्थन करायचे, हे त्यांना कळायला हवे. त्यांनी पंतप्रधानांवर जी टीका केली आहे, त्याचा आपण निषेध करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlok sabhaलोकसभाBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे