शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:28 IST

evm ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींपैकी ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आता ३६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या २१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

ठळक मुद्दे२१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात१५ जानेवारी रोजी मतदान, १८ जानेवारीला होणार उमेदवारांचा फैसला

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींपैकी ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आता ३६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या २१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपूर्वी या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. आता अनलॉक प्रक्रियेनंतर ४७९ ग्रामपंचायतींच्या १५०९ प्रभागांमधील ३९२१ सदस्यांसाठी या निवडणुका होणार आहेत.यासाठी ७२०३ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ८० अर्ज बाद झाले तर माघारीच्या दिवशी १०४८ उमेदवारांनी माघार घेतली. ११९ ग्रामपंचायतींतील १८१४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता ४७९ पैकी ३६० ग्रामपंचायतींच्या ४३३२ सदस्यांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून प्रवर्गाचा फायदाही महिलांना मिळणार आहे. मतदानासाठी १५९३ केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. १८ रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार उमेदवारांचा फैसला होणार आहे.संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणातसंगमेश्वर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यासाठी ११८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. १६१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. १९ ग्रामपंचायतींच्या २९८ उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी सर्वाधिक ७२९ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.सर्वाधिक बिनविरोध उमेदवार चिपळूण तालुक्यात जिल्ह्यातील एकूण ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तसेच १८१४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची सर्वाधिक संख्या खेड (२३) तर सर्वांत कमी मंडणगड तालुक्यात (२) आहे. मात्र, बिनविरोध उमेदवारांची सर्वाधिक संख्या चिपळूण (३४३) असून सर्वांत कमी मंडणगडात (४९) आहेत.महिला मतदारांची संख्या अधिकजिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आयोगाकडून घोषित करण्यात आल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींचे एकूण मतदार ६ लाख ७५ हजार ५४१ आहेत. यापैकी पुरुष मतदारांची संख्या ३ लाख २७ हजार ३७४ तर स्त्री मतदार ३ लाख ४८ हजार १५५ आहे तसेच अन्य मतदारांची संख्या १२ आहे. जिल्ह्यात स्त्री मतदारांची संख्या २० हजारांनी अधिक असल्याने त्यांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनgram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरी