शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीयोजना दुरुस्तीला ४ कोटींची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 17:50 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ नळपाणी योजना गेली काही वर्षे नादुरूस्त आहेत. या योजनांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला ४ कोटी १२ लाख ७५ हजार रूपयांची आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची प्रशासनाकडे मागणी, जिल्ह्यातील ६४ नळपाणी योजना नादुरुस्त.- हजारो लोकांना पाणीटंचाईचा बसतोय फटका,  जिल्हा प्रशासनाकडून दुरुस्तीचा प्रस्ताव.

रत्नागिरी : जिल्ह्यातील ६४ नळपाणी योजना गेली काही वर्षे नादुरूस्त आहेत. या योजनांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला ४ कोटी १२ लाख ७५ हजार रूपयांची आवश्यकता आहे.जिल्हा परिषदेने ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे आजही लाखो लोकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांतील वाड्यांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी झालेले आहे.

पूर्वी ग्रामीण भागातील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. आता मात्र, नळपाणी योजनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात ही गैरसोय दूर करण्यात आली.

या नळपाणी योजनांच्या पाणीपट्टीच्या वसुलीतून जिल्हा परिषदेला कमी प्रमाणात महसूल मिळत असला तरी पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनांवरील खर्च पाणीपट्टी वसुलीपेक्षा जास्त असतो.नादुरूस्त झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रूपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येत असले तरी ही दुरूस्ती वेळेवर होतेच नाही. त्यामुळे अनेकदा योजना नादुरुस्त झाल्याने जनतेच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींची धडपड सुरु असते.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तालुक्यातून नादुरुस्त योजनांची माहिती मागविली होती. त्यानुसार ग्रामीण भागातील ५३ गावातील ८५ वाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या शेकडो पाणी पुरवठ्याच्या योजना नादुरुस्त आहेत. त्यापैकी केवळ ६४ पाणी पुरवठा योजना दुरुस्त करण्यात येणार असून, त्यांसाठी ४ कोटी १२ लाख ७५ हजार रुपयांची आवश्यकता भासणर आहे.या नादुरुस्त नळपाणी योजनांची दुरुस्ती झाल्यास टंचाईच्या कालावधीत येथील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला या योजनांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी १२ लाख ७५ हजार रुपयांची आवश्यकता असून जिल्हा प्रशासनाकडे तशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी