शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रत्नागिरी जिल्ह्यात चार महिन्यात ३६७८ दाखल्यांचे वितरण,  कातकरी उत्थान अभियान, प्रशासनाची प्रभावी मोहीम ​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 11:29 IST

रत्नागिरी जिल्ह्यात कातकरी उत्थान अभियानांतर्गत चार महिन्यात विविध प्रकारच्या ३६७८ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आदिवासींच्या वस्त्यांवर जाऊन शिबिराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ही प्रभावी अंमलीबजावणी केली असून, हे अभियान १०० टक्के यशस्वी केले आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्ह्यात चार महिन्यात ३६७८ दाखल्यांचे वितरणकातकरी उत्थान अभियान, प्रशासनाची प्रभावी मोहीम ​​​​​​​

रत्नागिरी : जिल्ह्यात कातकरी उत्थान अभियानांतर्गत चार महिन्यात विविध प्रकारच्या ३६७८ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आदिवासींच्या वस्त्यांवर जाऊन शिबिराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ही प्रभावी अंमलीबजावणी केली असून, हे अभियान १०० टक्के यशस्वी केले आहे.जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, लांजा हे तीन तालुके वगळता उर्वरित मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण येथे आदिवासींची संख्या अधिक आहे. तसेच गुहागर, संगमेश्वर या भागातही काही प्रमाणात आहे. दुर्गम भागात राहणारे हे लोक निरक्षर असल्याने त्यांच्याकडे कुठलीच कागदपत्रे नाहीत. त्यामुळे त्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड काढताना अनेक अडचणी येतात.मात्र, आता या समाजातील अनेक मुले शिक्षणप्रवाहात येत आहेत. मात्र, त्यांना शैक्षणिक किंवा आरक्षणाचा लाभ मिळवून देताना त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र, दाखले या लोकांकडे नसल्याने त्यांच्या मुलांना शैक्षणिक संस्थात प्रवेश, शिष्यवृत्ती आदी शैक्षणिक सुविधा मिळवताना तसेच नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवतानाही अनेक अडचणी येत आहेत.

या समाजाच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना हे विविध प्रकारचे दाखले उपलब्ध व्हावेत यासाठी हे कातकरी उत्थान अभियान राबविण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या महसूल यंत्रणेच्या माध्यमातून तहसीलस्तरावर त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

या लोकांकडे उपलब्ध असलेल्या काही ठराविक पुराव्यांना ग्राह्य धरून शिबिराच्या माध्यमातून या समाजाच्या वस्त्यांवर जात त्यांना १३ प्रकारचे विविध दाखले तसेच रेशनकार्ड, मनरेगा जॉबकार्ड यांचे वितरण करण्यात आले.चार महिने राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे कातकरी, आदिवासी समाजातील लोकांना अडचणीचे ठरणारे जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, वयाचे दाखले यांची समस्या सोडवल्याने या समाजाला दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने डिसेंबर अखेरपर्यंत हे अभियान १०० टक्के यशस्वी केले असून, या अभियानांतर्गत १७९९ दाखल्यांचे वितरण केले आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी