शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

रत्नागिरी जिल्ह्यात चार महिन्यात ३६७८ दाखल्यांचे वितरण,  कातकरी उत्थान अभियान, प्रशासनाची प्रभावी मोहीम ​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 11:29 IST

रत्नागिरी जिल्ह्यात कातकरी उत्थान अभियानांतर्गत चार महिन्यात विविध प्रकारच्या ३६७८ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आदिवासींच्या वस्त्यांवर जाऊन शिबिराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ही प्रभावी अंमलीबजावणी केली असून, हे अभियान १०० टक्के यशस्वी केले आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्ह्यात चार महिन्यात ३६७८ दाखल्यांचे वितरणकातकरी उत्थान अभियान, प्रशासनाची प्रभावी मोहीम ​​​​​​​

रत्नागिरी : जिल्ह्यात कातकरी उत्थान अभियानांतर्गत चार महिन्यात विविध प्रकारच्या ३६७८ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आदिवासींच्या वस्त्यांवर जाऊन शिबिराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ही प्रभावी अंमलीबजावणी केली असून, हे अभियान १०० टक्के यशस्वी केले आहे.जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, लांजा हे तीन तालुके वगळता उर्वरित मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण येथे आदिवासींची संख्या अधिक आहे. तसेच गुहागर, संगमेश्वर या भागातही काही प्रमाणात आहे. दुर्गम भागात राहणारे हे लोक निरक्षर असल्याने त्यांच्याकडे कुठलीच कागदपत्रे नाहीत. त्यामुळे त्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड काढताना अनेक अडचणी येतात.मात्र, आता या समाजातील अनेक मुले शिक्षणप्रवाहात येत आहेत. मात्र, त्यांना शैक्षणिक किंवा आरक्षणाचा लाभ मिळवून देताना त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र, दाखले या लोकांकडे नसल्याने त्यांच्या मुलांना शैक्षणिक संस्थात प्रवेश, शिष्यवृत्ती आदी शैक्षणिक सुविधा मिळवताना तसेच नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवतानाही अनेक अडचणी येत आहेत.

या समाजाच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना हे विविध प्रकारचे दाखले उपलब्ध व्हावेत यासाठी हे कातकरी उत्थान अभियान राबविण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या महसूल यंत्रणेच्या माध्यमातून तहसीलस्तरावर त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

या लोकांकडे उपलब्ध असलेल्या काही ठराविक पुराव्यांना ग्राह्य धरून शिबिराच्या माध्यमातून या समाजाच्या वस्त्यांवर जात त्यांना १३ प्रकारचे विविध दाखले तसेच रेशनकार्ड, मनरेगा जॉबकार्ड यांचे वितरण करण्यात आले.चार महिने राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे कातकरी, आदिवासी समाजातील लोकांना अडचणीचे ठरणारे जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, वयाचे दाखले यांची समस्या सोडवल्याने या समाजाला दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने डिसेंबर अखेरपर्यंत हे अभियान १०० टक्के यशस्वी केले असून, या अभियानांतर्गत १७९९ दाखल्यांचे वितरण केले आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी