शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
2
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
3
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
4
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
5
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
6
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
7
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
8
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
9
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
10
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
11
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
12
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
13
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
14
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
15
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
16
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
17
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
18
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
19
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
20
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३४ हजार पेट्या हापूस मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 12:28 IST

Mango Ratnagiri : रत्नागिरी हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आहे. मुहूर्तासाठी सोमवारी तोडलेला आंबा मंगळवारी विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. साधारणत: पाडव्याला ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यावर्षी ३४ हजार १९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आहे. मुहूर्तासाठी सोमवारी तोडलेला आंबा मंगळवारी विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. साधारणत: पाडव्याला ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यावर्षी ३४ हजार १९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

गतवर्षी कोरोनामुळे वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील विक्री व्यवस्था बंद होती. त्यामुळे पाडवा असला तरी ग्राहकांनी खासगी विक्री केली होती. यावर्षी मात्र कोरोना संकट असतानाही वाशी व अन्य ठिकाणच्या बाजारपेठेत आंबा विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी आंबा तोड करून पाडव्यानिमित्त विक्रीसाठी आंबा पाठविला आहे.

कोकणातून ३४ हजार १९ पेट्या विक्रीसाठी मार्केटमध्ये आल्या होत्या, तसेच अन्य राज्यांतून २५ हजार ९५३ क्रेटशिवाय अन्य ८० टन सुटा आंबा विक्रीसाठी उपलब्ध होता. हापूसची आवक कमी असल्याने दर बऱ्यापैकी टिकून आहेत. दोन हजार ते साडेचार हजार रुपये दराने आंबापेटी विक्री सुरू आहे.

दोन सत्रांत विक्री

कोरोना संकटामुळे वाशी मार्केटमध्ये खरेदी-विक्रीसाठी गर्दी होऊ नये, कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन सत्रांत खरेदी- विक्रीचा निर्णय घेतला आहे. सकाळी नऊ वाजता विक्री होणार असल्याने सकाळी ७ पर्यंत आंबा घेऊन वाहने वाशीमध्ये पोहोचतील, याचे नियोजन करावे. उशिरा दाखल होणाऱ्या वाहनातील आंब्याची विक्री दुपारनंतर होणार आहे.

दरवर्षी गुढीपाडव्यासाठी ६० ते ७० हजार पेट्या वाशी मार्केटमध्ये विक्रीला येतात. मात्र, यावर्षी एकूणच आंबा कमी असल्याने आवक निम्म्यावर आली आहे. आवक घटल्यामुळे दर सध्या टिकले आहेत. दोन सत्रांत विक्री होणार असल्याने बागायतदारांनी नियोजन करून आंबा मार्केटमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत.

- संजय पानसरे,संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी (नवी मुंबई)

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी