शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३४ हजार पेट्या हापूस मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 12:28 IST

Mango Ratnagiri : रत्नागिरी हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आहे. मुहूर्तासाठी सोमवारी तोडलेला आंबा मंगळवारी विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. साधारणत: पाडव्याला ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यावर्षी ३४ हजार १९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आहे. मुहूर्तासाठी सोमवारी तोडलेला आंबा मंगळवारी विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. साधारणत: पाडव्याला ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यावर्षी ३४ हजार १९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

गतवर्षी कोरोनामुळे वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील विक्री व्यवस्था बंद होती. त्यामुळे पाडवा असला तरी ग्राहकांनी खासगी विक्री केली होती. यावर्षी मात्र कोरोना संकट असतानाही वाशी व अन्य ठिकाणच्या बाजारपेठेत आंबा विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी आंबा तोड करून पाडव्यानिमित्त विक्रीसाठी आंबा पाठविला आहे.

कोकणातून ३४ हजार १९ पेट्या विक्रीसाठी मार्केटमध्ये आल्या होत्या, तसेच अन्य राज्यांतून २५ हजार ९५३ क्रेटशिवाय अन्य ८० टन सुटा आंबा विक्रीसाठी उपलब्ध होता. हापूसची आवक कमी असल्याने दर बऱ्यापैकी टिकून आहेत. दोन हजार ते साडेचार हजार रुपये दराने आंबापेटी विक्री सुरू आहे.

दोन सत्रांत विक्री

कोरोना संकटामुळे वाशी मार्केटमध्ये खरेदी-विक्रीसाठी गर्दी होऊ नये, कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन सत्रांत खरेदी- विक्रीचा निर्णय घेतला आहे. सकाळी नऊ वाजता विक्री होणार असल्याने सकाळी ७ पर्यंत आंबा घेऊन वाहने वाशीमध्ये पोहोचतील, याचे नियोजन करावे. उशिरा दाखल होणाऱ्या वाहनातील आंब्याची विक्री दुपारनंतर होणार आहे.

दरवर्षी गुढीपाडव्यासाठी ६० ते ७० हजार पेट्या वाशी मार्केटमध्ये विक्रीला येतात. मात्र, यावर्षी एकूणच आंबा कमी असल्याने आवक निम्म्यावर आली आहे. आवक घटल्यामुळे दर सध्या टिकले आहेत. दोन सत्रांत विक्री होणार असल्याने बागायतदारांनी नियोजन करून आंबा मार्केटमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत.

- संजय पानसरे,संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी (नवी मुंबई)

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी