शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३४ हजार पेट्या हापूस मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 12:28 IST

Mango Ratnagiri : रत्नागिरी हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आहे. मुहूर्तासाठी सोमवारी तोडलेला आंबा मंगळवारी विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. साधारणत: पाडव्याला ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यावर्षी ३४ हजार १९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आहे. मुहूर्तासाठी सोमवारी तोडलेला आंबा मंगळवारी विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. साधारणत: पाडव्याला ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यावर्षी ३४ हजार १९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

गतवर्षी कोरोनामुळे वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील विक्री व्यवस्था बंद होती. त्यामुळे पाडवा असला तरी ग्राहकांनी खासगी विक्री केली होती. यावर्षी मात्र कोरोना संकट असतानाही वाशी व अन्य ठिकाणच्या बाजारपेठेत आंबा विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी आंबा तोड करून पाडव्यानिमित्त विक्रीसाठी आंबा पाठविला आहे.

कोकणातून ३४ हजार १९ पेट्या विक्रीसाठी मार्केटमध्ये आल्या होत्या, तसेच अन्य राज्यांतून २५ हजार ९५३ क्रेटशिवाय अन्य ८० टन सुटा आंबा विक्रीसाठी उपलब्ध होता. हापूसची आवक कमी असल्याने दर बऱ्यापैकी टिकून आहेत. दोन हजार ते साडेचार हजार रुपये दराने आंबापेटी विक्री सुरू आहे.

दोन सत्रांत विक्री

कोरोना संकटामुळे वाशी मार्केटमध्ये खरेदी-विक्रीसाठी गर्दी होऊ नये, कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन सत्रांत खरेदी- विक्रीचा निर्णय घेतला आहे. सकाळी नऊ वाजता विक्री होणार असल्याने सकाळी ७ पर्यंत आंबा घेऊन वाहने वाशीमध्ये पोहोचतील, याचे नियोजन करावे. उशिरा दाखल होणाऱ्या वाहनातील आंब्याची विक्री दुपारनंतर होणार आहे.

दरवर्षी गुढीपाडव्यासाठी ६० ते ७० हजार पेट्या वाशी मार्केटमध्ये विक्रीला येतात. मात्र, यावर्षी एकूणच आंबा कमी असल्याने आवक निम्म्यावर आली आहे. आवक घटल्यामुळे दर सध्या टिकले आहेत. दोन सत्रांत विक्री होणार असल्याने बागायतदारांनी नियोजन करून आंबा मार्केटमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत.

- संजय पानसरे,संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी (नवी मुंबई)

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी