शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, १ हजार ९४८ शेतकऱ्यांनी भरलेत अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:49 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३४ हजार २२२ शेतकऱ्यांना ६४ कोटी ३९ लाख रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अद्याप अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे- दीड लाखापेक्षा अधिक कर्ज थकीत असणाऱ्या २३९ शेतकऱ्यांना मिळाला लाभ.- अद्याप अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिली १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ.- कर्जमाफीसाठी ३१ मार्चपर्यंत दिलेल्या मुदतवाढीचा लाभ १ हजार ९४८ शेतकऱ्यांनी घेतला.

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३४ हजार २२२ शेतकऱ्यांना ६४ कोटी ३९ लाख रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अद्याप अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीसाठी ३१ मार्चपर्यंत दिलेल्या मुदतवाढीचा लाभ १ हजार ९४८ शेतकऱ्यांनी घेतला आहे.शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान जाहीर करताना या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाखावरील शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजना लागू केली. शासन निर्णयानुसार बँकांचे थकबाकीदार शेतकऱ्यांना राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरुन दिली होती.

शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २५ हजार ७४१ शेतकऱ्यांना ३० कोटी २९ लाख रूपयांचा लाभ मिळाला आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या ८ हजार ४८१ शेतकऱ्यांना ३४ कोटी एक लाख रूपयांचा लाभ मिळाला आहे.

जिल्ह्यातील १४ हजार ६४० थकबाकीदार शेतकऱ्यांना ४४ कोटी १९ लाखाची कर्जमाफी मिळाली आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या १० हजार ८६४ शेतकऱ्यांना २० कोटी ७९ लाख रूपयांचा लाभ मिळाला. राष्ट्रीयीकृत बँकेच्या ३ हजार ७७६ थकबाकीदार शेतकऱ्यांना २३ कोटी ४० लाखाची कर्जमाफी मिळाली आहे.नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १९ हजार ७३ शेतकऱ्यांना १८ कोटी १७ लाखाच्या ह्यप्रोत्साहनपर अनुदानह्ण योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १४ हजार ५८२ गाहकांना ९ कोटी २६ लाख प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या ४ हजार ४९१ ग्राहकांना ८ कोटी ९१ लाख रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे.

दीड लाखापेक्षा अधिक कर्ज थकीत असणाºया २३९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, त्यांचे दीड कोटी ९२ लाखांची कर्जमाफी झाली आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या २५ शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून २३ लाखांची माफी मिळाली आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या २१४ शेतकऱ्यांना एक कोटी ६९ लाख रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सुरूवातीला २४ जुलै ते २० सप्टेंबर २०१७ अखेर आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले होते. परंतु काही शेतकऱ्यांना वैयक्तिक, तांत्रिक कारणास्तव दिलेल्या मुदतीत अर्ज भरता आले नाहीत.

ज्या शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही यापूर्वी अर्ज केलेला नाही, अशा शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी १ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत आॅनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार १ हजार ९४८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. तरीही या योजनेंतर्गत वंचित शेतकऱ्यांना त्यांचे आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता १ ते १४ एप्रिल अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे.कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान

अपुऱ्या पावसामुळे खरीब/रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे उत्पादकता घटली. परिणामी नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतकऱ्यांना बसला. अनेक शेतकरी बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करु शकले नाहीत. थकबाकीदार राहिल्यामुळे बँकेकडून नव्याने पीक कर्ज घेता आले नाही. त्यामुळे राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यावेळी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे शासनाने घोषित केले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी