शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘रत्नागिरी ८’ या वाणाची ३२ टन विक्री, शिरगाव संशोधन केंद्राकडून भाताची वाण विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 18:36 IST

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरीतील शिरगाव संशोधन केंद्रातर्फे भाताची विविध वाण विकसित केली आहेत. या वाणांमधील ‘रत्नागिरी -८’ या वाणाला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, खरीप हंगामात प्राधान्याने भातशेती केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी भात बियाण्यांची खरेदी सुरू केली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्यारत्नागिरीतील शिरगाव संशोधन केंद्रातर्फे भाताची विविध वाण विकसित केली आहेत. या वाणांमधील ‘रत्नागिरी -८’ या वाणाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील केंद्रातून आतापर्यंत ३२ टन ‘रत्नागिरी - ८’ वाणाच्या बियाण्याची विक्री झाली आहे.शिरगाव येथील संशोधन केंद्रातर्फे विकसित केलेली भाताचे, भुईमुगाचे वाणाची बियाणी विक्रीसाठी ठेवलेली आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात बियाण्यांसाठी मागणी वाढत आहे. परराज्यातूनही बियाणांसाठी संशोधन केंद्राकडे मागणी होत आहे. अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या सुधारीत जातीच्या वाणांसाठी विशेष मागणी होत आहे. रत्नागिरी ६, ७, ८ सह कर्जत ६, ७, ८ या प्रकारची बियाणी सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

रत्नागिरी आठ हे वाण १३५ दिवसांत तयार होत आहे. चवीसाठी तांदूळ उत्तम असल्याने या बियाण्याला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी होत आहे. शिरगाव व वेंगुर्ला केंद्रातून प्रत्येकी १६ टन मिळून एकूण ३२ टन वाण बियाण्यांची विक्री झाली आहे.‘रत्नागिरी ८’ वाणाबराेबरच कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ‘रत्नागिरी - ७’ या लाल भाताच्या सुधारीत वाणालाही चांगली मागणी आहे. दुर्लक्षित राहिलेल्या लाल भाताचे आरोग्यदृष्ट्या याचे महत्त्व लक्षात आल्याने लाल भाताच्या लागवडीकडे कल वाढला आहे. लहान मुले, गरोदर माता, रुग्णांसाठी लाल भाताची पेज पौष्टिक आहे. १२० ते १२५ दिवसांत हे वाण तयार होते. खोडातील लवचितकतेमुळे जमिनीवर पडून लोळण्याचा धोका नाही. शिवाय उत्पादकताही जास्त देणारे वाण असल्याने मागणी होत आहे.

शिरगाव संशोधन केंद्रात सातत्याने नवनवीन संशोधन सुरू असते. रत्नागिरी ६ ते ८ या वाणांना जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रासह अन्य राज्यातून पसंती मिळाली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वाण उपलब्ध करून देण्यात आले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन केंद्रावर एकूण ३२ टन बियाण्यांची विक्री झाली आहे, ही बाब समाधानकारक आहे. - विजय दळवी, संशोधन अधिकारी, कृषी संशोधन केंद्र शिरगाव.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीuniversityविद्यापीठagricultureशेती