शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

‘रत्नागिरी ८’ या वाणाची ३२ टन विक्री, शिरगाव संशोधन केंद्राकडून भाताची वाण विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 18:36 IST

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरीतील शिरगाव संशोधन केंद्रातर्फे भाताची विविध वाण विकसित केली आहेत. या वाणांमधील ‘रत्नागिरी -८’ या वाणाला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, खरीप हंगामात प्राधान्याने भातशेती केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी भात बियाण्यांची खरेदी सुरू केली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्यारत्नागिरीतील शिरगाव संशोधन केंद्रातर्फे भाताची विविध वाण विकसित केली आहेत. या वाणांमधील ‘रत्नागिरी -८’ या वाणाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील केंद्रातून आतापर्यंत ३२ टन ‘रत्नागिरी - ८’ वाणाच्या बियाण्याची विक्री झाली आहे.शिरगाव येथील संशोधन केंद्रातर्फे विकसित केलेली भाताचे, भुईमुगाचे वाणाची बियाणी विक्रीसाठी ठेवलेली आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात बियाण्यांसाठी मागणी वाढत आहे. परराज्यातूनही बियाणांसाठी संशोधन केंद्राकडे मागणी होत आहे. अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या सुधारीत जातीच्या वाणांसाठी विशेष मागणी होत आहे. रत्नागिरी ६, ७, ८ सह कर्जत ६, ७, ८ या प्रकारची बियाणी सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

रत्नागिरी आठ हे वाण १३५ दिवसांत तयार होत आहे. चवीसाठी तांदूळ उत्तम असल्याने या बियाण्याला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी होत आहे. शिरगाव व वेंगुर्ला केंद्रातून प्रत्येकी १६ टन मिळून एकूण ३२ टन वाण बियाण्यांची विक्री झाली आहे.‘रत्नागिरी ८’ वाणाबराेबरच कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ‘रत्नागिरी - ७’ या लाल भाताच्या सुधारीत वाणालाही चांगली मागणी आहे. दुर्लक्षित राहिलेल्या लाल भाताचे आरोग्यदृष्ट्या याचे महत्त्व लक्षात आल्याने लाल भाताच्या लागवडीकडे कल वाढला आहे. लहान मुले, गरोदर माता, रुग्णांसाठी लाल भाताची पेज पौष्टिक आहे. १२० ते १२५ दिवसांत हे वाण तयार होते. खोडातील लवचितकतेमुळे जमिनीवर पडून लोळण्याचा धोका नाही. शिवाय उत्पादकताही जास्त देणारे वाण असल्याने मागणी होत आहे.

शिरगाव संशोधन केंद्रात सातत्याने नवनवीन संशोधन सुरू असते. रत्नागिरी ६ ते ८ या वाणांना जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रासह अन्य राज्यातून पसंती मिळाली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वाण उपलब्ध करून देण्यात आले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन केंद्रावर एकूण ३२ टन बियाण्यांची विक्री झाली आहे, ही बाब समाधानकारक आहे. - विजय दळवी, संशोधन अधिकारी, कृषी संशोधन केंद्र शिरगाव.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीuniversityविद्यापीठagricultureशेती