शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

‘रत्नागिरी ८’ या वाणाची ३२ टन विक्री, शिरगाव संशोधन केंद्राकडून भाताची वाण विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 18:36 IST

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरीतील शिरगाव संशोधन केंद्रातर्फे भाताची विविध वाण विकसित केली आहेत. या वाणांमधील ‘रत्नागिरी -८’ या वाणाला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, खरीप हंगामात प्राधान्याने भातशेती केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी भात बियाण्यांची खरेदी सुरू केली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्यारत्नागिरीतील शिरगाव संशोधन केंद्रातर्फे भाताची विविध वाण विकसित केली आहेत. या वाणांमधील ‘रत्नागिरी -८’ या वाणाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील केंद्रातून आतापर्यंत ३२ टन ‘रत्नागिरी - ८’ वाणाच्या बियाण्याची विक्री झाली आहे.शिरगाव येथील संशोधन केंद्रातर्फे विकसित केलेली भाताचे, भुईमुगाचे वाणाची बियाणी विक्रीसाठी ठेवलेली आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात बियाण्यांसाठी मागणी वाढत आहे. परराज्यातूनही बियाणांसाठी संशोधन केंद्राकडे मागणी होत आहे. अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या सुधारीत जातीच्या वाणांसाठी विशेष मागणी होत आहे. रत्नागिरी ६, ७, ८ सह कर्जत ६, ७, ८ या प्रकारची बियाणी सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

रत्नागिरी आठ हे वाण १३५ दिवसांत तयार होत आहे. चवीसाठी तांदूळ उत्तम असल्याने या बियाण्याला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी होत आहे. शिरगाव व वेंगुर्ला केंद्रातून प्रत्येकी १६ टन मिळून एकूण ३२ टन वाण बियाण्यांची विक्री झाली आहे.‘रत्नागिरी ८’ वाणाबराेबरच कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ‘रत्नागिरी - ७’ या लाल भाताच्या सुधारीत वाणालाही चांगली मागणी आहे. दुर्लक्षित राहिलेल्या लाल भाताचे आरोग्यदृष्ट्या याचे महत्त्व लक्षात आल्याने लाल भाताच्या लागवडीकडे कल वाढला आहे. लहान मुले, गरोदर माता, रुग्णांसाठी लाल भाताची पेज पौष्टिक आहे. १२० ते १२५ दिवसांत हे वाण तयार होते. खोडातील लवचितकतेमुळे जमिनीवर पडून लोळण्याचा धोका नाही. शिवाय उत्पादकताही जास्त देणारे वाण असल्याने मागणी होत आहे.

शिरगाव संशोधन केंद्रात सातत्याने नवनवीन संशोधन सुरू असते. रत्नागिरी ६ ते ८ या वाणांना जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रासह अन्य राज्यातून पसंती मिळाली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वाण उपलब्ध करून देण्यात आले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन केंद्रावर एकूण ३२ टन बियाण्यांची विक्री झाली आहे, ही बाब समाधानकारक आहे. - विजय दळवी, संशोधन अधिकारी, कृषी संशोधन केंद्र शिरगाव.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीuniversityविद्यापीठagricultureशेती