शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात ३,१०० जादा गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 14:31 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवात गावी येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, एसटी महामंडळाने यंदा कोकणात ३,१०० जादा गाड्या पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रत्नागिरी : गणेशोत्सवात गावी येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, एसटी महामंडळाने यंदा कोकणात ३,१०० जादा गाड्या पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १६ सप्टेंबरपासून या जादा गाड्या मार्गस्थ होतील. यातील दोन हजार गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणे अपेक्षित आहे. उर्वरित गाड्या रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील.दरवर्षी गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंबई व उपनगरातून जादा गाड्या सोडण्यात येतात. गणेश चतुर्थी दि. १९ सप्टेंबर रोजी आहे. तत्पूर्वी दोन ते तीन दिवस आधी सुरू होणाऱ्या जादा गाड्या १९ सप्टेंबरपर्यंत सुरू असतील. रत्नागिरी जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा अधिक गाड्या अपेक्षित आहेत. उर्वरित १,१०० गाड्या रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.गणेशोत्सवासाठी जादा गाड्या येणार असल्याने, रत्नागिरी विभागातर्फे दुरुस्तिपथके, गस्तीपथके, क्रेनची उपलब्धता केली जाणार आहे. कशेडी ते चिपळूण, संगमेश्वर ते हातखंबा व हातखंबा ते राजापूर मार्गावर तीन गस्तीपथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. खेड, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या चार ठिकाणी दुरुस्तीपथके उपलब्ध केली जाणार आहेत, शिवाय चिपळूण येथे क्रेन ठेवण्यात येणार आहे. विभागात तीन अद्ययावत ब्रेकडाऊन व्हॅन असून, त्या महामार्गावर भरणेनाका (खेड), चिपळूण, हातखंबा तिठा (रत्नागिरी) येथे तैनात ठेवल्या जाणार आहेत.परतीसाठी गौरी-गणपती विसर्जनापासून (दि. २३ सप्टेंबर) जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. १,९४८ जादा गाड्या सोडण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाइन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे.       

गणेशभक्तांच्या स्वागतासाठी रत्नागिरी विभाग सज्ज ठेवण्यात येणार आहे. मंडणगड ते राजापूर आगारात जादा गाड्या दाखल होणार असून, प्रत्येक आगाराला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, शिवाय गणेशभक्तांसाठी एसटीकडून परतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठीचे ऑनलाइन आरक्षणही उपलब्ध करण्यात आले आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सव