शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

रत्नागिरी जिल्ह्यात ३ हजार ८४२ अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 22:20 IST

जिल्ह्यात ४ हजार ४५४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर शनिवारपर्यंत ८६  नमुन्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

रत्नागिरी :  जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख जिल्हावासियांसाठी धोकादायक असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत घेण्यात आलेल्या स्वॅबच्या नमुन्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ ही बाबही जिल्हावासियांसाठी दिलासादायक आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेसह शिक्षक, केंद्रप्रमुख, आशा व अन्य कर्मचारी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जिवाची बाजी लावून काम करीत आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतानाही ९० टक्के कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़ तर १० टक्के रुग्ण खेडमधील कळंबणी व चिपळुणातील कामथे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आहे. 

जिल्ह्यात ४ हजार ४५४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर शनिवारपर्यंत ८६  नमुन्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते.  तसेच २ स्वॅब प्रयोगशाळेतून नाकारण्यात आले होते़  आतापर्यंत १४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़ तर ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त चाकरमानी आले आहेत़ त्यामध्ये अनेक जण छुप्या मार्गाने आल्याने ते जिल्हावासियांसाठी त्रासदायक ठरत आहेत. जिल्ह्यातील ८६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७५ रुग्ण मुंबईकर असल्याने चाकरमान्यांमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी