शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

रत्नागिरी जिल्ह्यात ३ हजार ८४२ अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 22:20 IST

जिल्ह्यात ४ हजार ४५४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर शनिवारपर्यंत ८६  नमुन्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

रत्नागिरी :  जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख जिल्हावासियांसाठी धोकादायक असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत घेण्यात आलेल्या स्वॅबच्या नमुन्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ ही बाबही जिल्हावासियांसाठी दिलासादायक आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेसह शिक्षक, केंद्रप्रमुख, आशा व अन्य कर्मचारी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जिवाची बाजी लावून काम करीत आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतानाही ९० टक्के कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़ तर १० टक्के रुग्ण खेडमधील कळंबणी व चिपळुणातील कामथे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आहे. 

जिल्ह्यात ४ हजार ४५४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर शनिवारपर्यंत ८६  नमुन्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते.  तसेच २ स्वॅब प्रयोगशाळेतून नाकारण्यात आले होते़  आतापर्यंत १४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़ तर ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त चाकरमानी आले आहेत़ त्यामध्ये अनेक जण छुप्या मार्गाने आल्याने ते जिल्हावासियांसाठी त्रासदायक ठरत आहेत. जिल्ह्यातील ८६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७५ रुग्ण मुंबईकर असल्याने चाकरमान्यांमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी