शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात धावल्या २६७ गाड्या, उत्पन्नात मात्र घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 17:42 IST

Ratnagiri StateTransport: शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वीकेंड लाॅकडाऊन घोषित केला होता. अत्यावश्यक सेवा म्हणून एस.टी.ला लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले होते. पण नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत, घराबाहेर पडणेच टाळले. त्यामुळे शनिवार, रविवार या दोन दिवसात प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी एस.टी.च्या सेवेवर परिणाम झाला.

ठळक मुद्देदोन दिवसात धावल्या २६७ गाड्या, उत्पन्नात मात्र घट प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी एस.टी.च्या सेवेवर परिणाम

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वीकेंड लाॅकडाऊन घोषित केला होता. अत्यावश्यक सेवा म्हणून एस.टी.ला लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले होते. पण नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत, घराबाहेर पडणेच टाळले. त्यामुळे शनिवार, रविवार या दोन दिवसात प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी एस.टी.च्या सेवेवर परिणाम झाला.

गेल्या दोन दिवसात बहुतांश मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या. शिवाय दोन दिवसात जेमतेम २६१ फेऱ्या केल्या. प्रवासी भारमानही फारसे लाभले नसल्याने उत्पन्नात घट झाली. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे एस.टी.च्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला होता. हळूहळू उत्पन्नाची गाडी रुळावर येत असताना, पुन्हा रत्नागिरी विभागाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

  • आगारातील एकूण बसेसची संख्या ६००
  • दोन दिवसात धावलेल्या बसेस २६७
  • फेऱ्या झाल्या आगारामध्ये ८८२
  • पैसे मिळाले दोन दिवसात २४०६४३१
  • दोन दिवसात ७५ लाखांचा तोटा 

 दैनंदिन ६०० गाड्यांद्वारे ४ हजार २०० फेऱ्यांद्वारे दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असल्यामुळे ५० लाखांपर्यंत उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होत आहे.मात्र शनिवारी ६८१, तर रविवारी २०१ फेऱ्या संपूर्ण विभागात होऊ शकल्या. त्यामुळे शनिवारी ३७ हजार ६२०, तर रविवारी ४५२० प्रवाशांनी प्रवास केला. दोन दिवसात अवघ्या ४२१४० प्रवाशांनी प्रवास केला. दोन दिवसात २४ लाख ६४३१ रुपयांचे उत्पन्न लाभले आहे. मात्र दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत ७५ लाख ९३ हजार ५६९ रुपयांचा तोटा विभागाला सोसावा लागत आहे.

निम्मेच कर्मचारी कामावर

शनिवारी ४०२ व रविवारी १३२, असे मिळून एकूण ५३४ चालक, वाहक कामावर होते. अन्य कर्मचाऱ्यांना मात्र सुटी देण्यात आली होती. वीकेंड लाॅकडाऊनमुळे प्रवाशांअभावी वाहतूक ठप्प झाली होती. कोरोना संसर्गाचा धोका असतानाही सेवेवर असणाऱ्या चालक, वाहकांनी सेवा बजावली. वाहकांचा तर प्रवाशांशी संपर्क येतच असल्याने खबरदारी घ्यावी लागते.

शासन आदेशाचे पालन करीत एस.टी.ची सेवा सुरू ठेवण्यात आली होती. मात्र प्रवासी भारमानाअभावी एस.टी.च्या सेवेवर परिणाम झाला आहे. सोमवारी मात्र बऱ्यापैकी प्रवासी प्रतिसाद लाभला.- सुनील भोकरे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीRatnagiriरत्नागिरी