शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 15:01 IST

Ganeshotsav St Ratnagiri : यंदाही गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी कोरोनाने आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी गावी येणाऱ्यांची संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे. त्यासाठी कोकणात २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे.

ठळक मुद्दे गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणारपरिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती

रत्नागिरी : यंदाही गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी कोरोनाने आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी गावी येणाऱ्यांची संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे. त्यासाठी कोकणात २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे.

आषाढ महिना सुरू होतानाच गणेशोत्सवाचे वेध लागतात. गतवर्षापासून कोरोनाचे वातावरण असल्याने भाविकांच्या उत्साहाला ग्रहण लागले आहे. मात्र सध्या रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंधही कमी होत आहेत.परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मुंबई येथे ही माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून दि. ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून, चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. दि. १६ जुलै २०२१ पासून त्यासाठीच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत.दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे परब यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी दि. ४ ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील, तर १४ ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचेही म्हणजेच एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून, सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.गणेशोत्सवादरम्यान एस. टी.ची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मार्गावर तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत, असेही परब यांनी सांगितले.कोकण रेल्वे फुल्लकोकण रेल्वेने आपल्या जादा गाड्यांची घोषणा आधीच केली आहे. तीन महिने आधी त्याचे आरक्षण सुरु होत असल्याने ते पूर्णही झाले आहे. आता एस. टी. महामंडळाने जादा गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांसाठी मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवstate transportएसटीRatnagiriरत्नागिरी