शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 15:01 IST

Ganeshotsav St Ratnagiri : यंदाही गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी कोरोनाने आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी गावी येणाऱ्यांची संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे. त्यासाठी कोकणात २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे.

ठळक मुद्दे गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणारपरिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती

रत्नागिरी : यंदाही गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी कोरोनाने आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी गावी येणाऱ्यांची संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे. त्यासाठी कोकणात २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे.

आषाढ महिना सुरू होतानाच गणेशोत्सवाचे वेध लागतात. गतवर्षापासून कोरोनाचे वातावरण असल्याने भाविकांच्या उत्साहाला ग्रहण लागले आहे. मात्र सध्या रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंधही कमी होत आहेत.परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मुंबई येथे ही माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून दि. ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून, चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. दि. १६ जुलै २०२१ पासून त्यासाठीच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत.दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे परब यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी दि. ४ ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील, तर १४ ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचेही म्हणजेच एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून, सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.गणेशोत्सवादरम्यान एस. टी.ची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मार्गावर तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत, असेही परब यांनी सांगितले.कोकण रेल्वे फुल्लकोकण रेल्वेने आपल्या जादा गाड्यांची घोषणा आधीच केली आहे. तीन महिने आधी त्याचे आरक्षण सुरु होत असल्याने ते पूर्णही झाले आहे. आता एस. टी. महामंडळाने जादा गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांसाठी मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवstate transportएसटीRatnagiriरत्नागिरी