शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

रत्नागिरी जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 18:55 IST

child ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालके असून, त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या बालकांना अतिरिक्त पोषण आहार पुरवण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे. मात्र, अनुदान नसल्याने हा खर्च कुठून करणार, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालकेअतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बाल विकास केंद्र सुरू

रत्नागिरी : जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालके असून, त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या बालकांना अतिरिक्त पोषण आहार पुरवण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे. मात्र, अनुदान नसल्याने हा खर्च कुठून करणार, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे जनतेसाठी विविध योजना राबविताना शासनाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेक योजनांचा निधी कपात करण्यात आल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या महिला व विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कुपोषित बालकांच्या पोषण आहार योजनेला बसला आहे.मागील वर्षभरात ० ते ६ वयोगटांतील ८१,८०१ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ७४,०३३ मुले सर्वसाधारण वजनाची आणि मध्यम वजनाची ६,३८८ मुले आहेत. मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४५७ असून, तीव्र कुपोषित बालके २२ आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील चार बालके, दापोलीतील ५, रत्नागिरी ४, राजापुरात २ आणि चिपळूण, खेडमधील एका बालकाचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक कमी वजनाची बालके गुहागर तालुक्यात आहेत.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून कुपोषित बालकांवर लक्ष ठेवण्यात येते. मात्र निधीअभावी पोषण आहाराचे नियोजन गावपातळीवर करण्याचे आदेश अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहेत. हा खर्च अंगणवाडी सेविकांना शासनाकडून नंतर देण्यात येणार आहे. मात्र, अल्प मानधनावर काम करणाऱ्या या अंगणवाडीसेविका खर्च कुठून करणार? हा प्रश्न आहे.कोरोनामुळे निधी नाहीया बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण बालविकास केंद्रासाठी १५०० रुपये दिले जातात. त्यात ९०० रुपये पोषण आहारासाठी आणि उर्वरित ६०० रुपये औषधे, अंगणवाडी सेविकांचा खर्च यावर केला जातो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा निधी आलेला नाही.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी