शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील २११ गावे दरडग्रस्त, प्रशासनाकडून सज्जता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 12:56 IST

प्रशासकीय यंत्रणांना सज्जतेचे आदेश

रत्नागिरी : वर्ष २००५ पासून जिल्ह्यात पावसाळ्यात विविध नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढत आहे. यापैकीच एक म्हणजे जिल्ह्यात डोंगराळ भाग असल्याने गेल्या काही वर्षांपासून दरड कोसळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करता जिल्ह्यात संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये २११ गावांचा समावेश आहे.वर्ष २००५ पासून जिल्ह्यात पावसाळ्यात भूस्खलन किंवा दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील २११ गावांकडे विशेष लक्ष ठेवून असते. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांना पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गतवर्षी अनेक गावांमध्ये कोसळल्या दरडीगत वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वादळी पाऊस झाला. यामुळे अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. चिपळूण येथील परशुराम घाट, आंबा घाट, तसेच अन्य काही भागांमध्ये दरडी कोसळल्याने काही मार्ग बंद राहिल्याने वाहतूक बंद होती. काही घरांवर, परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही तैनातदरवर्षी पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तैनात ठेवल्या जातात. या पावसाळ्यातही एनडीआरएफच्या तुकड्या जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी तैनात राहणार आहेत.

जिल्ह्यात ३०० आपदा मित्रांची फळीरत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ३०० आपदामित्र आणि सखी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तींमध्ये या आपदा मित्रांकडून मदत कार्य होणार आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने दरडप्रवण भागातील नागरिकांनाही स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.

प्रशासकीय यंत्रणांना सज्जतेचे आदेशजिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांची पावसाळा पूर्व तयारीसाठी सर्व विभागांची बैठक घेऊन संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यास सांगितला होता. त्यानुसार सर्व विभागप्रमुखांना पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षी परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. दोन दिवसांपूर्वीच या घाटाची पाहणी करून या विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. - एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन