शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

रत्नागिरी जिल्ह्यातील २११ गावे दरडग्रस्त, प्रशासनाकडून सज्जता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 12:56 IST

प्रशासकीय यंत्रणांना सज्जतेचे आदेश

रत्नागिरी : वर्ष २००५ पासून जिल्ह्यात पावसाळ्यात विविध नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढत आहे. यापैकीच एक म्हणजे जिल्ह्यात डोंगराळ भाग असल्याने गेल्या काही वर्षांपासून दरड कोसळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करता जिल्ह्यात संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये २११ गावांचा समावेश आहे.वर्ष २००५ पासून जिल्ह्यात पावसाळ्यात भूस्खलन किंवा दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील २११ गावांकडे विशेष लक्ष ठेवून असते. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांना पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गतवर्षी अनेक गावांमध्ये कोसळल्या दरडीगत वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वादळी पाऊस झाला. यामुळे अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. चिपळूण येथील परशुराम घाट, आंबा घाट, तसेच अन्य काही भागांमध्ये दरडी कोसळल्याने काही मार्ग बंद राहिल्याने वाहतूक बंद होती. काही घरांवर, परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही तैनातदरवर्षी पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तैनात ठेवल्या जातात. या पावसाळ्यातही एनडीआरएफच्या तुकड्या जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी तैनात राहणार आहेत.

जिल्ह्यात ३०० आपदा मित्रांची फळीरत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ३०० आपदामित्र आणि सखी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तींमध्ये या आपदा मित्रांकडून मदत कार्य होणार आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने दरडप्रवण भागातील नागरिकांनाही स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.

प्रशासकीय यंत्रणांना सज्जतेचे आदेशजिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांची पावसाळा पूर्व तयारीसाठी सर्व विभागांची बैठक घेऊन संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यास सांगितला होता. त्यानुसार सर्व विभागप्रमुखांना पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षी परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. दोन दिवसांपूर्वीच या घाटाची पाहणी करून या विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. - एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन