शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रत्नागिरी जिल्ह्यातील २११ गावे दरडग्रस्त, प्रशासनाकडून सज्जता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 12:56 IST

प्रशासकीय यंत्रणांना सज्जतेचे आदेश

रत्नागिरी : वर्ष २००५ पासून जिल्ह्यात पावसाळ्यात विविध नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढत आहे. यापैकीच एक म्हणजे जिल्ह्यात डोंगराळ भाग असल्याने गेल्या काही वर्षांपासून दरड कोसळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करता जिल्ह्यात संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये २११ गावांचा समावेश आहे.वर्ष २००५ पासून जिल्ह्यात पावसाळ्यात भूस्खलन किंवा दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील २११ गावांकडे विशेष लक्ष ठेवून असते. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांना पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गतवर्षी अनेक गावांमध्ये कोसळल्या दरडीगत वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वादळी पाऊस झाला. यामुळे अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. चिपळूण येथील परशुराम घाट, आंबा घाट, तसेच अन्य काही भागांमध्ये दरडी कोसळल्याने काही मार्ग बंद राहिल्याने वाहतूक बंद होती. काही घरांवर, परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही तैनातदरवर्षी पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तैनात ठेवल्या जातात. या पावसाळ्यातही एनडीआरएफच्या तुकड्या जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी तैनात राहणार आहेत.

जिल्ह्यात ३०० आपदा मित्रांची फळीरत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ३०० आपदामित्र आणि सखी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तींमध्ये या आपदा मित्रांकडून मदत कार्य होणार आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने दरडप्रवण भागातील नागरिकांनाही स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.

प्रशासकीय यंत्रणांना सज्जतेचे आदेशजिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांची पावसाळा पूर्व तयारीसाठी सर्व विभागांची बैठक घेऊन संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यास सांगितला होता. त्यानुसार सर्व विभागप्रमुखांना पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षी परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. दोन दिवसांपूर्वीच या घाटाची पाहणी करून या विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. - एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन