शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:51 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता.

ठळक मुद्देबारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी चोख बंदोबस्त : १५५ महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रविष्ठ

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता.रत्नागिरी जिल्ह्यातील १५५ कनिष्ठ महाविद्यालयांतून २१,१४७ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखा ५,५८६ विद्यार्थी, कला शाखा ६,२५८, वाणिज्य शाखा ८,६७० आणि एमसीव्हीसीचे ६३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९५ कनिष्ठ महाविद्यालयांतून ११,२२६ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखा २,८९५, कला शाखा २,६९३, वाणिज्य शाखा ४,६२७, तर एमसीव्हीसीचे १ हजार ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.बारावी परीक्षेसाठी कोकण विभागात ६० केंद्र असून, त्यामध्ये रत्नागिरीत ३७, तर सिंधुदुर्गमध्ये २३ केंद्र आहेत. २० परीरक्षक केंद्र असून, त्यामध्ये रत्नागिरीत १२ केंद्र, तर सिंधुदुर्गमध्ये ८ परीरक्षक केंद्र आहेत.परीक्षेसाठी सुमारे एक तास आधीच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाली होते. विद्यार्थ्यांसमवेत पालकही आपल्या पाल्याचा परीक्षा क्रमांक पाहण्यासाठी मदत करत होते. विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी पालकही परीक्षा केंद्राबाहेर उपस्थित राहिल्याने परीक्षा केंद्राबाहेर गर्दी झाली होती. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तपासणीनंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी