शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

बारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:51 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता.

ठळक मुद्देबारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी चोख बंदोबस्त : १५५ महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रविष्ठ

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता.रत्नागिरी जिल्ह्यातील १५५ कनिष्ठ महाविद्यालयांतून २१,१४७ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखा ५,५८६ विद्यार्थी, कला शाखा ६,२५८, वाणिज्य शाखा ८,६७० आणि एमसीव्हीसीचे ६३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९५ कनिष्ठ महाविद्यालयांतून ११,२२६ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखा २,८९५, कला शाखा २,६९३, वाणिज्य शाखा ४,६२७, तर एमसीव्हीसीचे १ हजार ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.बारावी परीक्षेसाठी कोकण विभागात ६० केंद्र असून, त्यामध्ये रत्नागिरीत ३७, तर सिंधुदुर्गमध्ये २३ केंद्र आहेत. २० परीरक्षक केंद्र असून, त्यामध्ये रत्नागिरीत १२ केंद्र, तर सिंधुदुर्गमध्ये ८ परीरक्षक केंद्र आहेत.परीक्षेसाठी सुमारे एक तास आधीच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाली होते. विद्यार्थ्यांसमवेत पालकही आपल्या पाल्याचा परीक्षा क्रमांक पाहण्यासाठी मदत करत होते. विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी पालकही परीक्षा केंद्राबाहेर उपस्थित राहिल्याने परीक्षा केंद्राबाहेर गर्दी झाली होती. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तपासणीनंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी