शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

एकत्र येत शेतकऱ्यांनी पिकविले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 18:26 IST

लाॅकडाऊनचा फटका काहीअंशी बसला. मात्र न डगमगता शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर विक्री केली. भविष्यात फळप्रक्रिया व दुग्ध प्रक्रिया उद्योग उभारण्याचा गटाचा मानस आहे.

मेहरुन नाकाडे

रत्नागिरी : सेंद्रिय उत्पादनांना असलेली वाढती मागणी लक्षात घेता, संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण येथील २१ शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. गेली चार वर्षे संजीवन सेंद्रिय शेती गटातर्फे बारमाही शेतीतून विविध उत्पादने घेत उत्पन्न मिळवत आहेत. सामूहिक प्रयत्नातून ५० एकर क्षेत्र सेंद्रिय लागवडीखाली आणले आहे.

खरिपात भात लागवड, रब्बीमध्ये भाजीपाला, कुळीथ, वाल, भुईमूग, पावटा, कलिंगड लागवड करीत आहेत. वेळोवेळी आलटून पालटून पिके घेण्यात येत आहेत. गांडूळ खताच्या वापरामुळे जमीन सुपीक व कसदार बनली असून उत्पादनही चांगले मिळत आहे. गतवर्षी १२० टन कलिंगडाचे उत्पन्न या गटाने घेतले होते. लाॅकडाऊनचा फटका काहीअंशी बसला. मात्र न डगमगता शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर विक्री केली. भविष्यात फळप्रक्रिया व दुग्ध प्रक्रिया उद्योग उभारण्याचा गटाचा मानस आहे. गटाचे अध्यक्ष प्रभाकर मांगले व सर्व सहभागी परिश्रम घेत असले तरी, त्यांना कृषी विभाग, आत्मा विभाग, तसेच कृषी अधिकारी मृणालिनी यादव यांचे सहकार्य लाभत आहे. गवा रेड्याचा उपद्रव होत असला तरी शेतकरी सतत शेतावर पहारा देत आहेत.

गांडूळ खत निर्मिती

गटातर्फे गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. दरवर्षी २० टन खत निर्मिती करून गटासाठी ठेवून उर्वरित दहा ते बारा टन खत विक्री करीत आहेत. त्यामुळे खत विक्रीतून गटासाठी उत्पन्न प्राप्त होत आहे. भविष्यात गांडूळ खत निर्मिती वाढविण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष मांगले यांनी सांगितले.

अवजार बँक

यांत्रिक अवजारांमुळे वेळ, खर्च वाचतो. त्यामुळे गटाने शासकीय अनुदानावर अवजारे गटासाठी संकलित केली असून, अवजार बँकच जणू तयार केली आहे. गटाच्या शेतीसाठी अवजारांचा वापर करीत असतानाच शेतकरी, गटाचे सदस्य यांना नाममात्र भाड्याने अवजारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा अनावश्यक वेळ वाचत आहे. शिवाय कामही वेळेवर पूर्ण केले जात आहे.

भात, भाजीपाला, कलिंगड, आंबा, काजूचे उत्पादन गटातर्फे घेण्यात येत आहे. सेंद्रिय उत्पादनाला विशेष मागणी असून हातोहात विक्री होत आहे. विक्रीसाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. भविष्यात शेती वाढविण्यावर गटाचा भर राहणार आहे.

गतवर्षी कृषी विभागाने भुईमूग बियाणे उपलब्ध करून दिले होते. कोकणच्या लाल मातीत भुईमुगाचे चांगले पीक येत असल्याचे गटाने सिध्द केले आहे. सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण झाले असून, गटाकडे प्रमाणपत्रही प्राप्त असून उत्पादन विक्रीमध्ये सुलभता आली आहे.

सेंद्रिय पध्दतीने उत्पादित आंबा, काजूलाही विशेष मागणी आहे. आंबा कच्चा व पिकलेला दोन्ही प्रकारचा विकण्यात येतो. ग्राहक स्वत:हून गटाकडे संपर्क साधून खरेदी करीत आहेत. कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेत असून, विक्रीही स्वत:च केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी