शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी २०० कोटींची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

चिपळूण : महामार्गाच्या चौपदरीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची कमतरता असल्याने कामात अडचणी येत असल्याची बाजू ...

चिपळूण : महामार्गाच्या चौपदरीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची कमतरता असल्याने कामात अडचणी येत असल्याची बाजू राष्ट्रीय महामार्ग विभागाने उच्च न्यायालयासमोर मांडली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणप्रश्नी उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांनी कोकणवासीयांच्या हितासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत राष्ट्रीय महामार्ग विभागाने आपली बाजू मांडली.

काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल आकारणी करू नये, असे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने टोल आकारला जाणार नसल्याचे हमीपत्र न्यायालयाला दिले होते. याचिकाकर्ते ॲड. ओवेस पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्गावर पावसामुळे पडलेले खड्डे, वाशिष्ठी नदीचा रखडलेला पूल, जुन्या पुलांची झालेली दुरवस्था, वाशिष्ठी नदीच्या पुलावरून प्रवास करण्याकरता सुरक्षिततेची काळजी म्हणून हॅलोजन लाईट, सेफ्टी लाईट, रिफ्लेक्टर इंडिकेटर बसविण्यात आलेले नाहीत. तसेच खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याचा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच चिपळुणातील महामार्गाची उंची वाढल्यामुळे सांडपाणी वाहून जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सांडपाण्यामुळे शहरात सांडपाण्याचा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा विचार करून शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. त्यानुसार मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

याविषयी ॲड. ओवेस पेचकर यांनी सांगितले की, उच्च न्यायालयात सोमवारी याविषयी झालेल्या सुनावणीत आपली बाजू मांडली. चौपदरीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी अजूनही सुमारे २०० कोटी रुपयांची कमतरता आहे. त्यामुळेच या कामात अडथळा निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, याविषयी परिपूर्ण माहिती व त्यावर उपाययोजनांबाबत २० सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीवेळी माहिती देण्यात येणार आहे.