शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी २०० कोटींची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

चिपळूण : महामार्गाच्या चौपदरीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची कमतरता असल्याने कामात अडचणी येत असल्याची बाजू ...

चिपळूण : महामार्गाच्या चौपदरीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची कमतरता असल्याने कामात अडचणी येत असल्याची बाजू राष्ट्रीय महामार्ग विभागाने उच्च न्यायालयासमोर मांडली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणप्रश्नी उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांनी कोकणवासीयांच्या हितासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत राष्ट्रीय महामार्ग विभागाने आपली बाजू मांडली.

काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल आकारणी करू नये, असे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने टोल आकारला जाणार नसल्याचे हमीपत्र न्यायालयाला दिले होते. याचिकाकर्ते ॲड. ओवेस पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्गावर पावसामुळे पडलेले खड्डे, वाशिष्ठी नदीचा रखडलेला पूल, जुन्या पुलांची झालेली दुरवस्था, वाशिष्ठी नदीच्या पुलावरून प्रवास करण्याकरता सुरक्षिततेची काळजी म्हणून हॅलोजन लाईट, सेफ्टी लाईट, रिफ्लेक्टर इंडिकेटर बसविण्यात आलेले नाहीत. तसेच खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याचा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच चिपळुणातील महामार्गाची उंची वाढल्यामुळे सांडपाणी वाहून जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सांडपाण्यामुळे शहरात सांडपाण्याचा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा विचार करून शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. त्यानुसार मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

याविषयी ॲड. ओवेस पेचकर यांनी सांगितले की, उच्च न्यायालयात सोमवारी याविषयी झालेल्या सुनावणीत आपली बाजू मांडली. चौपदरीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी अजूनही सुमारे २०० कोटी रुपयांची कमतरता आहे. त्यामुळेच या कामात अडथळा निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, याविषयी परिपूर्ण माहिती व त्यावर उपाययोजनांबाबत २० सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीवेळी माहिती देण्यात येणार आहे.