शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कोटा येथून १८ विद्यार्थी रत्नागिरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 14:13 IST

या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी परिवहन मंत्री अ‍ॅॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही प्रयत्न केले. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यांतून महाराष्ट्रात आणण्यात आले.

ठळक मुद्देवैद्यकीय तपासणीनंतर पालकांच्या ताब्यात

रत्नागिरी : राजस्थानामधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या रत्नागिरीतील १८ विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी ६ वाजता रत्नागिरीत एस्. टी. बसने आणण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ असे एकूण २२ विद्यार्थ्यांना रत्नागिरीत आणण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी गेलेले महाराष्ट्रातील १८०० विद्यार्थी कोटा येथे लॉकडाऊनमुळे अडकले होते. या सर्व विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली होती. या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी परिवहन मंत्री अ‍ॅॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही प्रयत्न केले. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यांतून महाराष्ट्रात आणण्यात आले.परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराच्या सुमारे ७६ बसेस कोटा येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेल्या होत्या. तेथून विद्यार्थ्यांना घेऊन दि. ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता परतीच्या प्रवासासाठी रवाना झाल्या. शनिवारी सकाळी ही बस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली. यामध्ये मंडणगड ९, खेड ९, दापोली २, रत्नागिरी ६ आणि सिंधुदुर्ग ३ असे एकूण २२ विद्यार्थी होते. खेड, मंडणगड, दापोलीतील विद्यार्थ्यांची कळंबणी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली, तर रत्नागिरीतील सहा विद्यार्थ्यांची शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थी