शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

जिल्ह्यातील १५९ मुले शैक्षणिक प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार सलग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार सलग दहा दिवस शाळाबाह्य शोधमोहीम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात आली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या सहकार्याने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली असताना तीन लाख १३ हजार ८०२ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्याअंतर्गत १५९ मुले शाळेत दाखल झाली आहेत. याशिवाय स्थलांरित ७०१ मुले जिल्ह्यात आली आहेत.

कोरोनामध्ये लॉकडाऊन काळात अन्य जिल्ह्यातून काही कुटुंबे रत्नागिरीत आली, लॉकडाऊन संपल्यानंतर काही कुटुंबांनी मुंबईत परत जाण्याऐवजी गावातच राहण्याचा निर्णय घेतला. परराज्यातील काही कुटुंबे गावाकडे गेली होती, तीही परतली. कामे सुरू असून शहरातील विविध कामांसाठी कामगारांचे तांडे अन्य जिल्ह्यांतून आले आहेत.

तीन लाख कुटुंबांचे सर्वेक्षण

जिल्ह्यातील तीन लाख १३ हजार ८०२ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १५९ मुले शाळाबाह्य आढळली असून ८८ मुले व ७१ मुलींचा समावेश आहे. शिवाय २४ दिव्यांग मुले आहेत. जिल्ह्यात ७०१ मुले स्थलांतरित होऊन आली असून ३५८ मुले, ३४३ मुली आहेत. त्यामध्ये विशेष गरजा असलेल्या १५ मुलांचा समावेश आहे.

१०८ कुंटुंबे स्थलांतरित

शहरात व आसपासच्या गावात परजिल्ह्यातील कामगारांचे तांडे कामानिमित्त येत असतात. मात्र कामे संपल्यानंतर तांडे अन्यत्र निघून जातात. अशा तांड्यांचेही सर्वेक्षण करण्यात आले असता, तांड्यातील १०८ मुले परजिल्ह्यात परतली आहेत. त्यामध्ये ५६ मुलगे व ५२ मुलींचा समावेश आहे. विशेष गरजा असलेले एकमेव मूल होते.

चिपळूण तालुक्यात सर्वाधिक मुले

सर्वेक्षणांतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले चिपळूण तालुक्यात सापडली आहेत. सर्वात कमी संख्या गुहागर व संगमेश्वर तालुक्यात आहे. रत्नागिरी तालुक्यातील शाळाबाह्य मुले शून्य असली तरी नगर परिषदेच्या हद्दीत १८ मुले सापडली आहेत. शाळाबाह्य मुलांमध्ये मुलग्यांची संख्या अधिक असून मुलींची संख्या तुलनेने कमी आहे. सर्व मुलांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करून घेण्यात आले आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार शाळाबाह्य सर्वेक्षण मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली. त्यामध्ये १५९ मुले शाळेत दाखल झाली असून स्थलांतरित ७०१ मुले जिल्ह्यात आली आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या सहकार्याने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी