शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

जिल्ह्यातील १५९ मुले शैक्षणिक प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार सलग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार सलग दहा दिवस शाळाबाह्य शोधमोहीम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात आली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या सहकार्याने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली असताना तीन लाख १३ हजार ८०२ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्याअंतर्गत १५९ मुले शाळेत दाखल झाली आहेत. याशिवाय स्थलांरित ७०१ मुले जिल्ह्यात आली आहेत.

कोरोनामध्ये लॉकडाऊन काळात अन्य जिल्ह्यातून काही कुटुंबे रत्नागिरीत आली, लॉकडाऊन संपल्यानंतर काही कुटुंबांनी मुंबईत परत जाण्याऐवजी गावातच राहण्याचा निर्णय घेतला. परराज्यातील काही कुटुंबे गावाकडे गेली होती, तीही परतली. कामे सुरू असून शहरातील विविध कामांसाठी कामगारांचे तांडे अन्य जिल्ह्यांतून आले आहेत.

तीन लाख कुटुंबांचे सर्वेक्षण

जिल्ह्यातील तीन लाख १३ हजार ८०२ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १५९ मुले शाळाबाह्य आढळली असून ८८ मुले व ७१ मुलींचा समावेश आहे. शिवाय २४ दिव्यांग मुले आहेत. जिल्ह्यात ७०१ मुले स्थलांतरित होऊन आली असून ३५८ मुले, ३४३ मुली आहेत. त्यामध्ये विशेष गरजा असलेल्या १५ मुलांचा समावेश आहे.

१०८ कुंटुंबे स्थलांतरित

शहरात व आसपासच्या गावात परजिल्ह्यातील कामगारांचे तांडे कामानिमित्त येत असतात. मात्र कामे संपल्यानंतर तांडे अन्यत्र निघून जातात. अशा तांड्यांचेही सर्वेक्षण करण्यात आले असता, तांड्यातील १०८ मुले परजिल्ह्यात परतली आहेत. त्यामध्ये ५६ मुलगे व ५२ मुलींचा समावेश आहे. विशेष गरजा असलेले एकमेव मूल होते.

चिपळूण तालुक्यात सर्वाधिक मुले

सर्वेक्षणांतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले चिपळूण तालुक्यात सापडली आहेत. सर्वात कमी संख्या गुहागर व संगमेश्वर तालुक्यात आहे. रत्नागिरी तालुक्यातील शाळाबाह्य मुले शून्य असली तरी नगर परिषदेच्या हद्दीत १८ मुले सापडली आहेत. शाळाबाह्य मुलांमध्ये मुलग्यांची संख्या अधिक असून मुलींची संख्या तुलनेने कमी आहे. सर्व मुलांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करून घेण्यात आले आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार शाळाबाह्य सर्वेक्षण मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली. त्यामध्ये १५९ मुले शाळेत दाखल झाली असून स्थलांतरित ७०१ मुले जिल्ह्यात आली आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या सहकार्याने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी