शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

परतीसाठी १५८ गाड्या मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 05:13 IST

सर्वाधिक गाड्या मंगळवारी; ग्रुप बुकिंग केलेल्यांसाठी ६६६ गाड्या सोडण्यात येणार

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी बहुसंख्येने आलेले भाविक आता गणेशविसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. सोमवारी रत्नागिरी विभागातून १५८ गाड्या सोमवारी मुंबईकडे रवाना झाल्या. दि.२४ सप्टेंबर पर्यत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून मंगळवारी सर्वाधिक ६६६ गाड्या परतीसाठी सोडण्यात येणार आहेत.गौरी गणपतीसाठी मुंबई व उपविभागातून २२२५ गाड्यांमधून भाविक रत्नागिरी जिल्ह्यात आले. आता मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला असून सोमवारपासूनच जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. एकूण १३६६ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून ग्रुप बु कींगच्या २४४ गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे.मुंबई व उपनगरातील आगारातून जादा एसटी बसेस जिल्ह्यात आल्या होत्या.रत्नागिरी विभागातून देखील मुंबई, उपनगरांसाठी परतीकरिता जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. सोमवारी मुंबईसाठी ३८, बोरीवली ५०, कल्याण ८, ठाणे २२, भांडुप ७, विठ्ठलवाडी ३, नालासोपारा १०, विरार ३, पुणे १६, मिळून १५७ आरक्षित व एक गु्रप बुकींग अशा एकूण १५८ जादा गाड्या रवाना झाल्या. मंगळवारी कामावर जाण्यासाठी अनेक मंडळींनी आधीच आरक्षण करून ठेवल्याने गौरी गणपतींचे विसर्जन करून लगेचच मुंबईकडे निघाले आहेत.परतीच्या प्रवासासाठी दि. २४ पर्यत नियोजन केले असले तरी सर्वाधिक गाड्या मंगळवार दि. १८ रोजी रवाना होणार आहेत. मुंबईसाठी ११५, परेल ९, बोरीवली १८९, कल्याण २२, ठाणे ६२, भांडुप १७, विठ्ठलवाडी २२, नालासोपारा ४१, भार्इंदर १, विरार ११, पुणे ३२ व इतर २ मिळून ५२३ गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले आहे.ग्रुप बुकींगसाठी १४३ गाड्यांचे आरक्षण केल्यामुळे एकूण ६६६ गाड्या सोडण्यात येणार आहेत.बुधवार दि. १९ रोजी मुंबईसाठी ७५, परेल ३, बोरीवली १२०, कल्याण १०, ठाणे ४०, भांडुप १२, विठ्ठलवाडी १३, नालासोपारा २९, विरार ९, पुणे १८ एकूण ३२९ जादा गाड्यांचे आरक्षण व ग्रुप बुकींगच्या ९८ गाड्यांचे आरक्षण केले असून एकूण ४२७ गाड्या सोडण्यात येणार आहेत.सुरुवातीच्या तीन दिवसांत एसटीला चांगला प्रतिसाद आहे. त्यानंतर, दि.२० रोजी ९५, दि.२१ रोजी ११, दि.२२ रोजी ५, दि.२३ रोजी ४ जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. आरक्षण सुरू असून, प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळGanpati Festivalगणेशोत्सव