शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परतीसाठी १५८ गाड्या मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 05:13 IST

सर्वाधिक गाड्या मंगळवारी; ग्रुप बुकिंग केलेल्यांसाठी ६६६ गाड्या सोडण्यात येणार

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी बहुसंख्येने आलेले भाविक आता गणेशविसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. सोमवारी रत्नागिरी विभागातून १५८ गाड्या सोमवारी मुंबईकडे रवाना झाल्या. दि.२४ सप्टेंबर पर्यत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून मंगळवारी सर्वाधिक ६६६ गाड्या परतीसाठी सोडण्यात येणार आहेत.गौरी गणपतीसाठी मुंबई व उपविभागातून २२२५ गाड्यांमधून भाविक रत्नागिरी जिल्ह्यात आले. आता मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला असून सोमवारपासूनच जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. एकूण १३६६ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून ग्रुप बु कींगच्या २४४ गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे.मुंबई व उपनगरातील आगारातून जादा एसटी बसेस जिल्ह्यात आल्या होत्या.रत्नागिरी विभागातून देखील मुंबई, उपनगरांसाठी परतीकरिता जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. सोमवारी मुंबईसाठी ३८, बोरीवली ५०, कल्याण ८, ठाणे २२, भांडुप ७, विठ्ठलवाडी ३, नालासोपारा १०, विरार ३, पुणे १६, मिळून १५७ आरक्षित व एक गु्रप बुकींग अशा एकूण १५८ जादा गाड्या रवाना झाल्या. मंगळवारी कामावर जाण्यासाठी अनेक मंडळींनी आधीच आरक्षण करून ठेवल्याने गौरी गणपतींचे विसर्जन करून लगेचच मुंबईकडे निघाले आहेत.परतीच्या प्रवासासाठी दि. २४ पर्यत नियोजन केले असले तरी सर्वाधिक गाड्या मंगळवार दि. १८ रोजी रवाना होणार आहेत. मुंबईसाठी ११५, परेल ९, बोरीवली १८९, कल्याण २२, ठाणे ६२, भांडुप १७, विठ्ठलवाडी २२, नालासोपारा ४१, भार्इंदर १, विरार ११, पुणे ३२ व इतर २ मिळून ५२३ गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले आहे.ग्रुप बुकींगसाठी १४३ गाड्यांचे आरक्षण केल्यामुळे एकूण ६६६ गाड्या सोडण्यात येणार आहेत.बुधवार दि. १९ रोजी मुंबईसाठी ७५, परेल ३, बोरीवली १२०, कल्याण १०, ठाणे ४०, भांडुप १२, विठ्ठलवाडी १३, नालासोपारा २९, विरार ९, पुणे १८ एकूण ३२९ जादा गाड्यांचे आरक्षण व ग्रुप बुकींगच्या ९८ गाड्यांचे आरक्षण केले असून एकूण ४२७ गाड्या सोडण्यात येणार आहेत.सुरुवातीच्या तीन दिवसांत एसटीला चांगला प्रतिसाद आहे. त्यानंतर, दि.२० रोजी ९५, दि.२१ रोजी ११, दि.२२ रोजी ५, दि.२३ रोजी ४ जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. आरक्षण सुरू असून, प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळGanpati Festivalगणेशोत्सव