शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

रत्नागिरीतील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १३५ अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 17:48 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, अर्ज भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत हाेती. या चार ...

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, अर्ज भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत हाेती. या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी, मंगळवारी रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या चार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकूण अर्ज ११, तर सदस्य पदासाठी एकूण अर्ज १२५ आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यातीलही शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या चार ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी २१ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. २७) अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती.

शेवटच्या दिवशी तालुक्यातील चरवेली ग्रामपंचायतीत एकूण नऊ अर्ज दाखल झाले. यात सरपंच पदासाठी एक आणि सात सदस्यांच्या जागेसाठी आठ अर्ज आले आहेत. फणसोप ग्रामपंचायतीचे ३० अर्ज दाखल झाले असून, सरपंच पदासाठी दोन आणि सदस्यांच्या ११ जागासांठी २८ अर्ज आले आहेत.

पोमेंडी खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी एकूण ४१ अर्ज दाखल झाले असून, सरपंचाच्या एका जागेसाठी चार आणि सदस्यांच्या ११ जागांसाठी ३७ अर्ज आले आहेत. शिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५६ अर्ज आले आहेत. सरपंचाच्या जागेसाठी ४ आणि सदस्यांच्या १७ जागांसाठी ५२ अर्ज आले आहेत.

२८ रोजी अर्जांची छाननी होणार असून, ३० रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदानाची तारीख बदलली असल्याने आता १३ ऑक्टोबर ऐवजी १६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर १६ ऐवजी १७ रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक