शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रत्नागिरीतील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १३५ अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 17:48 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, अर्ज भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत हाेती. या चार ...

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, अर्ज भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत हाेती. या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी, मंगळवारी रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या चार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकूण अर्ज ११, तर सदस्य पदासाठी एकूण अर्ज १२५ आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यातीलही शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या चार ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी २१ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. २७) अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती.

शेवटच्या दिवशी तालुक्यातील चरवेली ग्रामपंचायतीत एकूण नऊ अर्ज दाखल झाले. यात सरपंच पदासाठी एक आणि सात सदस्यांच्या जागेसाठी आठ अर्ज आले आहेत. फणसोप ग्रामपंचायतीचे ३० अर्ज दाखल झाले असून, सरपंच पदासाठी दोन आणि सदस्यांच्या ११ जागासांठी २८ अर्ज आले आहेत.

पोमेंडी खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी एकूण ४१ अर्ज दाखल झाले असून, सरपंचाच्या एका जागेसाठी चार आणि सदस्यांच्या ११ जागांसाठी ३७ अर्ज आले आहेत. शिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५६ अर्ज आले आहेत. सरपंचाच्या जागेसाठी ४ आणि सदस्यांच्या १७ जागांसाठी ५२ अर्ज आले आहेत.

२८ रोजी अर्जांची छाननी होणार असून, ३० रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदानाची तारीख बदलली असल्याने आता १३ ऑक्टोबर ऐवजी १६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर १६ ऐवजी १७ रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक