शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

श्रमदानातून १३० वनराई बंधारे

By admin | Updated: October 6, 2015 23:41 IST

पाणी टंचाईवर उपाय : महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान

रहिम दलाल-- रत्नागिरी -‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या धर्तीवर महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गावोगावी लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची हजारो कामे सुरु असून, सुमारे २०० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये विद्यार्थी, स्थानिक रहिवासी श्रमदानासाठी पुढे सरसावल्याने जिल्हा परिषद कृषी विभाग अधिक जोमाने उतरला आहे. जिल्ह्यात चालू वर्षात उन्हाळ्यामध्ये जूनच्या पंधरवड्यामध्ये ९८ गावांतील २२७ वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यात येत होते. त्यामध्येही विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. त्याचे चांगले परिणाम उन्हाळ्यामध्ये दिसून येत होते. मात्र, मागील वर्षामध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम बंद करण्यात आले होते. यंदा पावसाचे प्रमाण आणि दरवर्षी जिल्ह्यात उद्भवणारी पाणीटंचाई याचा विचार करता येत्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान ५ ते ६ बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.पावसाळा संपल्याने आता ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. यासाठी प्लास्टिक पिशव्या, दगड, माती आदींचा वापर करण्यात येत आहे. हे अभियान राबवण्यासाठी तालुक्याचे सर्व प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी गावांमध्ये जाऊन पाणी अडवण्याबाबत जनजागृती करत आहेत. तसेच ते बंधाऱ्यांच्या बांधकामामध्ये सहभागी होत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ठिकठिकाणच्या गावांमध्ये सुमारे १३० वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, जनता आणि खासगी कंपन्यांना सहकार्याचे आवाहनही केले होते. त्याला प्रतिसाद देत जयगड येथील जिंदल कंपनीने १ लाख प्लास्टिकच्या पिशव्या बंधाऱ्यांसाठी मोफत दिल्या आहेत. गावोगावी बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्यांमुळे पाणी टंचाईवर मात करणे काही अंशी शक्य होणार आहे.त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. तालुका बांधलेले वनराई बंधारेमंडणगड०६दापोली५५खेड००चिपळूण१३गुहागर०६संगमेश्वर००रत्नागिरी०४लांजा१६राजापूर३०एकूण१३०