शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

श्रमदानातून १३० वनराई बंधारे

By admin | Updated: October 6, 2015 23:41 IST

पाणी टंचाईवर उपाय : महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान

रहिम दलाल-- रत्नागिरी -‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या धर्तीवर महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गावोगावी लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची हजारो कामे सुरु असून, सुमारे २०० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये विद्यार्थी, स्थानिक रहिवासी श्रमदानासाठी पुढे सरसावल्याने जिल्हा परिषद कृषी विभाग अधिक जोमाने उतरला आहे. जिल्ह्यात चालू वर्षात उन्हाळ्यामध्ये जूनच्या पंधरवड्यामध्ये ९८ गावांतील २२७ वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यात येत होते. त्यामध्येही विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. त्याचे चांगले परिणाम उन्हाळ्यामध्ये दिसून येत होते. मात्र, मागील वर्षामध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम बंद करण्यात आले होते. यंदा पावसाचे प्रमाण आणि दरवर्षी जिल्ह्यात उद्भवणारी पाणीटंचाई याचा विचार करता येत्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान ५ ते ६ बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.पावसाळा संपल्याने आता ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. यासाठी प्लास्टिक पिशव्या, दगड, माती आदींचा वापर करण्यात येत आहे. हे अभियान राबवण्यासाठी तालुक्याचे सर्व प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी गावांमध्ये जाऊन पाणी अडवण्याबाबत जनजागृती करत आहेत. तसेच ते बंधाऱ्यांच्या बांधकामामध्ये सहभागी होत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ठिकठिकाणच्या गावांमध्ये सुमारे १३० वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, जनता आणि खासगी कंपन्यांना सहकार्याचे आवाहनही केले होते. त्याला प्रतिसाद देत जयगड येथील जिंदल कंपनीने १ लाख प्लास्टिकच्या पिशव्या बंधाऱ्यांसाठी मोफत दिल्या आहेत. गावोगावी बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्यांमुळे पाणी टंचाईवर मात करणे काही अंशी शक्य होणार आहे.त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. तालुका बांधलेले वनराई बंधारेमंडणगड०६दापोली५५खेड००चिपळूण१३गुहागर०६संगमेश्वर००रत्नागिरी०४लांजा१६राजापूर३०एकूण१३०