शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 18:08 IST

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेत जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखाची कर्जमाफी मिळाली असून, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेतएप्रिलपासून जिल्ह्यात कर्जवितरण सुरू

रत्नागिरी : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेत जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखाची कर्जमाफी मिळाली असून, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत.सन २०१२ ते २०१६ असे सलग चार वर्षे अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यामुळे अनेक शेतकरी पीककर्जाची परतफेड करू शकले नाहीत. राज्य शासनाने २०१७ मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी जाहीर केली.

या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी, दीड लाखांवरील शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते.सन् २००९ - १० ते २०१५ - १६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६पर्यंत थकबाकीदार असतील, त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता.

शासन निर्णयानुसार, जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची राज्य शासनाने पुरवलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती.

जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांचे मिळून ६१ हजार ४४१ शेतकरी कर्जदार आहेत. त्यातील ४७ हजार १९४ शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यत कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केल्याने ते पात्र ठरले होते.

पात्र शेतकऱ्यांची माहिती भरून घेण्यात आली. राज्य शासनाकडून केलेल्या छाननीत जून २०१८ पर्यंत ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांचे ६७ कोटी ३४ लाखांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. अद्याप १२ हजार ६१३ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरु आहे.सन २००१ ते २००९ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. परंतु त्या कालावधीत झालेल्या कर्जमाफीचे लाभार्थी झाले नाहीत, अशा पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा शासनाने केली होती, त्याची ही प्रक्रिया सुरू झाली.नव्याने कर्जवाटप सुरुनव्या खरीप हंगामासाठी एप्रिलपासून जिल्ह्यात कर्जवितरण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ३० हजार ५०६ शेतकऱ्यांना ४० कोटी ८८ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी