शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

जिल्ह्यातील तब्बल १०९९२ रिक्षाचालकांना शासनाची ‘राेटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST

अरुण आडिवरेकर लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. याकाळात ...

अरुण आडिवरेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात रिक्षा व्यवसायही बंद राहणार असल्याने त्यांच्यासाठी शासनाने मदतीचा हात दिला आहे. शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १०,९९२ परवानाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

गतवर्षी करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला हाेता. अनेकजण केवळ रिक्षा व्यवसायावरच अवलंबून असल्याने घर चालवायचे कसे, असा प्रश्न व्यावसायिकांना पडलेला हाेता. रिक्षा व्यावसायिकांचे झालेले नुकसान पाहता सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात रिक्षा व्यावसायिकांचे नुकसान हाेऊ नये यासाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे त्यांच्या ‘राेटी’चा प्रश्न मिटणार आहे.

लाॅकडाऊनमुळे रिक्षाचालकांवर उपासमार करण्याची वेळ आली आहे. रिक्षा व्यवसायच बंद ठेवल्याने करायचे काय? शासन मदत म्हणून दीड हजार रुपये देणार आहे. त्यामध्ये घर तरी चालेल का? मग इतर खर्च तर बाजूलाच राहिले आहेत. ही मदत तुटपुंजीच आहे.

- प्रभाकर खडपे, राजापूर

शासनाने मदत देऊ केली आहे. ही मदत कधी मिळेल तेव्हा मिळेल; पण ही मदत म्हणजे व्यावसायिकांची चेष्टाच आहे. आजच्या महागाईत ही मदत परवडणारी आहे का? भाजी, सिलिंडर, इंधन यांचे दर वाढतच आहेत. त्यामध्ये ही मदत किती पुरेशी पडणार आहे. त्यापेक्षा व्यवसाय सुरू करण्यास द्यावा.

- प्रमाेद वायंगणकर, रत्नागिरी

शासनाने दिलेली मदत ही अपुरी आहे. व्यवसाय पूर्णपणे बंद असून, केवळ दाेन सीटचीच परवानगी दिली आहे. ते न परवडणारे आहे. दर वाढविला तर प्रवाशांच्या राेषाला सामाेरे जावे लागते. शासन दीड हजार रुपये मदत देणार आहे; पण रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ताच तीन हजार रुपयांपर्यंत आहे. मग ही मदत पुरेल का? कर्जाचा हप्ता आणि घरखर्च यांचा ताळमेळ घालणे मुश्कील झाले आहे.

- मिलिंद चव्हाण, अध्यक्ष

रिक्षा चालक-मालक संघटना कडवई - तुरळ -चिखली

थेट खात्यात पैसे

शासनाने जाहीर केलेल्या मदतीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यातर्फे परवानाधारक रिक्षाचालकांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी शासनाकडे सादर केली जाणार असून, त्यानंतर रिक्षाचालकांच्या थेट खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

मदत अपुरी

अनेकांचा केवळ रिक्षा हाच व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. कर्जाचे हप्ते, विमा यासह कुटुंबीयांसाठी हाेणारा खर्च खूप आहे. त्यामानाने मिळणारी ही मदत खूपच अपुरी असल्याचा सूर रिक्षाचालकांमधून उमटू लागला आहे. ही मदत वाढविणे गरजेचे आहे.