शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

जिल्ह्यातील तब्बल १०९९२ रिक्षाचालकांना शासनाची ‘राेटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST

अरुण आडिवरेकर लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. याकाळात ...

अरुण आडिवरेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात रिक्षा व्यवसायही बंद राहणार असल्याने त्यांच्यासाठी शासनाने मदतीचा हात दिला आहे. शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १०,९९२ परवानाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

गतवर्षी करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला हाेता. अनेकजण केवळ रिक्षा व्यवसायावरच अवलंबून असल्याने घर चालवायचे कसे, असा प्रश्न व्यावसायिकांना पडलेला हाेता. रिक्षा व्यावसायिकांचे झालेले नुकसान पाहता सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात रिक्षा व्यावसायिकांचे नुकसान हाेऊ नये यासाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे त्यांच्या ‘राेटी’चा प्रश्न मिटणार आहे.

लाॅकडाऊनमुळे रिक्षाचालकांवर उपासमार करण्याची वेळ आली आहे. रिक्षा व्यवसायच बंद ठेवल्याने करायचे काय? शासन मदत म्हणून दीड हजार रुपये देणार आहे. त्यामध्ये घर तरी चालेल का? मग इतर खर्च तर बाजूलाच राहिले आहेत. ही मदत तुटपुंजीच आहे.

- प्रभाकर खडपे, राजापूर

शासनाने मदत देऊ केली आहे. ही मदत कधी मिळेल तेव्हा मिळेल; पण ही मदत म्हणजे व्यावसायिकांची चेष्टाच आहे. आजच्या महागाईत ही मदत परवडणारी आहे का? भाजी, सिलिंडर, इंधन यांचे दर वाढतच आहेत. त्यामध्ये ही मदत किती पुरेशी पडणार आहे. त्यापेक्षा व्यवसाय सुरू करण्यास द्यावा.

- प्रमाेद वायंगणकर, रत्नागिरी

शासनाने दिलेली मदत ही अपुरी आहे. व्यवसाय पूर्णपणे बंद असून, केवळ दाेन सीटचीच परवानगी दिली आहे. ते न परवडणारे आहे. दर वाढविला तर प्रवाशांच्या राेषाला सामाेरे जावे लागते. शासन दीड हजार रुपये मदत देणार आहे; पण रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ताच तीन हजार रुपयांपर्यंत आहे. मग ही मदत पुरेल का? कर्जाचा हप्ता आणि घरखर्च यांचा ताळमेळ घालणे मुश्कील झाले आहे.

- मिलिंद चव्हाण, अध्यक्ष

रिक्षा चालक-मालक संघटना कडवई - तुरळ -चिखली

थेट खात्यात पैसे

शासनाने जाहीर केलेल्या मदतीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यातर्फे परवानाधारक रिक्षाचालकांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी शासनाकडे सादर केली जाणार असून, त्यानंतर रिक्षाचालकांच्या थेट खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

मदत अपुरी

अनेकांचा केवळ रिक्षा हाच व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. कर्जाचे हप्ते, विमा यासह कुटुंबीयांसाठी हाेणारा खर्च खूप आहे. त्यामानाने मिळणारी ही मदत खूपच अपुरी असल्याचा सूर रिक्षाचालकांमधून उमटू लागला आहे. ही मदत वाढविणे गरजेचे आहे.