शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिकेने जिल्ह्यात ३४,७१३ जणांना दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:08 IST

Health, Hospital, Ratnagirinews, ambulances आरोग्य विभागाची १०८ रुग्णवाहिका रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. कोरोना काळात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील १७ रुग्णवाहिकांमधून तब्बल ३६,७१३ रुग्णांना उपचारासाठी दाखल केले. यापैकी १५,६९१ कोरोना रुग्णांची रूग्णवाहिकांमधून ने - आण करण्यात आली.

ठळक मुद्दे१०८ रुग्णवाहिकेने जिल्ह्यात ३४,७१३ जणांना दिले जीवदानआठ महिन्यात १५,६९१ कोरोना रूग्णांची ने-आण

शोभना कांबळेरत्नागिरी : आरोग्य विभागाची १०८ रुग्णवाहिका रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. कोरोना काळात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील १७ रुग्णवाहिकांमधून तब्बल ३६,७१३ रुग्णांना उपचारासाठी दाखल केले. यापैकी १५,६९१ कोरोना रुग्णांची रूग्णवाहिकांमधून ने - आण करण्यात आली.जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकेच्या नियोजनाची जबाबदारी कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक डॉ. अरूण मोराळे, रत्नागिरीचे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील आणि उपजिल्हा व्यवस्थापक विशाल पवार यांच्यावर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १०८ची सेवा १७ रुग्णवाहिका, ४० चालक आणि १८ डॉक्टर्स सांभाळत आहेत.कोरोना काळात १५,६९१ रुग्णांना दिले जीवनदानरुग्णांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची मदत घेतली जाते. यंदा एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे कोरोनाच्या गंभीर रूग्णांची ने-आण करण्यासाठीही या सेवेचा उपयोग करण्यात आला. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात या रूग्णवाहिकांनी १५,६९१ कोरोना रूग्णांना उपचार मिळवून दिले.अपघातातील रुग्णांचे वाचविले प्राणजिल्ह्यातील १७ रूग्णवाहिकांमधून गेल्या आठ महिन्यांत विविध अपघातांमधील १७८ अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून दिले. त्याचबरोबर हृदयरोग, भाजलेले, गंभीर इजा, प्रसुती यासाठीही १०८ रूग्णवाहिकेची मदत घेण्यात येते.डॉक्टर, कर्मचाऱ्यांची २४ तास सजग सेवाया रूग्णवाहिकेत असलेले डॉक्टर आणि कर्मचारी यांना सतत सजग राहावे लागते. त्यांना थांबण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात खोली दिली जाते. रुग्णाला हलविण्यासाठी १०८ सेवा हवी असल्यास पुणे येथील कॉल सेंटरकडे कळविले जाते. त्यावरून जिथे सेवा हवी आहे, तिथल्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर यांच्याशी संपर्क केला जातो.

१०८ सेवेवर जीपीएस यंत्रणेचे नियंत्रण असते. रूग्णवाहिका मध्येच थांबली किंवा अधिक वेगाने जाऊ लागली तर मुख्य सेंटरला कळते. लागलीच त्याबाबत चालकाला फोन करून विचारणा केली जाते. विनाखंड सेवेसाठी सदैव दक्ष राहावे लागते.- डॉ. अरूण मोराळे,विभागीय व्यवस्थापक

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यRatnagiriरत्नागिरी