शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

१०८ रुग्णवाहिकेने जिल्ह्यात ३४,७१३ जणांना दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:08 IST

Health, Hospital, Ratnagirinews, ambulances आरोग्य विभागाची १०८ रुग्णवाहिका रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. कोरोना काळात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील १७ रुग्णवाहिकांमधून तब्बल ३६,७१३ रुग्णांना उपचारासाठी दाखल केले. यापैकी १५,६९१ कोरोना रुग्णांची रूग्णवाहिकांमधून ने - आण करण्यात आली.

ठळक मुद्दे१०८ रुग्णवाहिकेने जिल्ह्यात ३४,७१३ जणांना दिले जीवदानआठ महिन्यात १५,६९१ कोरोना रूग्णांची ने-आण

शोभना कांबळेरत्नागिरी : आरोग्य विभागाची १०८ रुग्णवाहिका रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. कोरोना काळात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील १७ रुग्णवाहिकांमधून तब्बल ३६,७१३ रुग्णांना उपचारासाठी दाखल केले. यापैकी १५,६९१ कोरोना रुग्णांची रूग्णवाहिकांमधून ने - आण करण्यात आली.जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकेच्या नियोजनाची जबाबदारी कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक डॉ. अरूण मोराळे, रत्नागिरीचे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील आणि उपजिल्हा व्यवस्थापक विशाल पवार यांच्यावर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १०८ची सेवा १७ रुग्णवाहिका, ४० चालक आणि १८ डॉक्टर्स सांभाळत आहेत.कोरोना काळात १५,६९१ रुग्णांना दिले जीवनदानरुग्णांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची मदत घेतली जाते. यंदा एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे कोरोनाच्या गंभीर रूग्णांची ने-आण करण्यासाठीही या सेवेचा उपयोग करण्यात आला. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात या रूग्णवाहिकांनी १५,६९१ कोरोना रूग्णांना उपचार मिळवून दिले.अपघातातील रुग्णांचे वाचविले प्राणजिल्ह्यातील १७ रूग्णवाहिकांमधून गेल्या आठ महिन्यांत विविध अपघातांमधील १७८ अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून दिले. त्याचबरोबर हृदयरोग, भाजलेले, गंभीर इजा, प्रसुती यासाठीही १०८ रूग्णवाहिकेची मदत घेण्यात येते.डॉक्टर, कर्मचाऱ्यांची २४ तास सजग सेवाया रूग्णवाहिकेत असलेले डॉक्टर आणि कर्मचारी यांना सतत सजग राहावे लागते. त्यांना थांबण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात खोली दिली जाते. रुग्णाला हलविण्यासाठी १०८ सेवा हवी असल्यास पुणे येथील कॉल सेंटरकडे कळविले जाते. त्यावरून जिथे सेवा हवी आहे, तिथल्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर यांच्याशी संपर्क केला जातो.

१०८ सेवेवर जीपीएस यंत्रणेचे नियंत्रण असते. रूग्णवाहिका मध्येच थांबली किंवा अधिक वेगाने जाऊ लागली तर मुख्य सेंटरला कळते. लागलीच त्याबाबत चालकाला फोन करून विचारणा केली जाते. विनाखंड सेवेसाठी सदैव दक्ष राहावे लागते.- डॉ. अरूण मोराळे,विभागीय व्यवस्थापक

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यRatnagiriरत्नागिरी