शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

शोधू कुठं; परदेशातून आलेले १०६ जण सापडेनात, रत्नागिरी आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 15:45 IST

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत परदेशातून ७४ नागरिक आले होते. मात्र, शनिवारी त्यामध्ये आणखी ८३ नागरिकांची भर पडली आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या १५७ झाली आहे.

रत्नागिरी : ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात परदेशातून १५७ जण दाखल झाले आहेत. त्यापैकी ५१ जणांची कोरोना चाचणी झाली असून, त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आहे. मात्र, १०६ जणांचा अजूनही आराेग्य विभागाला शाेध लागलेला नाही. या सर्वांचा शाेध घेण्याचे काम सुरु असून, त्यांचा शाेध लागत नसल्याने आराेग्य यंत्रणेसमाेर आव्हान उभे राहिले आहे.

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला हाेता. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात येत हाेती. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट जीवघेणा असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येत असून, परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी कठोर नियम पाळण्यात येत आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत परदेशातून ७४ नागरिक आले होते. मात्र, शनिवारी त्यामध्ये आणखी ८३ नागरिकांची भर पडली आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या १५७ झाली आहे.

परदेशातून जिल्ह्यात दाखल झालेले नागरिक विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांची तत्काळ शासनाकडे नोंद करण्यात येत आहे. त्यानंतर त्या लोकांची माहिती जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला कळविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दाखल झालेल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणा धडपडत आहे. ज्या गावामध्ये परदेशातून नागरिक आले आहेत. त्या गावाच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांना कळविण्यात येत आहे. तेथून परदेशातून आलेल्या नागरिकांशी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत संपर्क साधण्यात येत आहे. आतापर्यंत परदेशातून आलेल्या ५१ लोकांशी संपर्क साधण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली आहे. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मात्र, जिल्ह्यात दाखल झालेल्या १०६ जणांचा अद्यापही शाेध लागलेला नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा शाेध घेण्याचे आव्हान आता आराेग्य यंत्रणेसमाेर आहे. याबाबत त्या-त्या तालुक्यातील आराेग्य यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. यातील काही नागरिकांचे माेबाईल नंबर बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क साधणे मुश्किल झाले आहे. त्यांचा शाेध घेऊन त्यांचे तत्काळ विलगीकरण करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

मंडणगड ०८

दापोली २६

खेड २९

चिपळूण ३५

गुहागर ०२

संमेश्वर १०

रत्नागिरी ३४

लांजा ०१

राजापूर ०३

परदेशातून आलेले नागरिक

दुबई - २०

कतार- ०८

कुवेत- ०५

ओमान ०४

बहारीन ०३

अमेरिका ०३

सऊदी अरेबिया ०२

आबूधाबी ०१

शारजा ०१

साऊथ आफ्रिका ०१

युके ०१

चेन्नई ०१

सिंगापूर ०१

एकूण ५१

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या