शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

अल्पसंख्याक वस्त्यांना १ कोटी

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

विकासकामांचा मार्ग मोकळा : शासनाने झटकली प्रस्तावावरील धूळ

रत्नागिरी : अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांतील वस्त्यांमधील विकास कामांसाठी शासनाने १ कोटी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यातील दोन वर्षे पडून असलेल्या या विकासकामांचा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बाळ माने यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे आता अल्पसंख्याक बहुल वस्त्यांमध्ये विकासकामे लवकरच मार्गी लागणार आहेत. राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा देऊन तेथील ग्रामस्थांचा जीवनमानाचा दर्जा उंचावणे, या उद्देशाने शासनाकडून हा विकासनिधी वितरित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल असलेल्या वस्त्यांचाही विकास व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने दोन वर्षांपूर्वी शासनाकडे विकासकामांचा प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव शासनाकडे धूळखात पडला होता. याप्रमाणे इतर जिल्ह्यांतील अल्पसंख्याक बहुल वस्त्यांचेही प्रस्ताव शासनाकडे आले होते. यामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करणे, रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे, पाखाडी बांधणे, निवारा शेड बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, गटार बांधणे, रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, आदी विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. इतर समाजासह अल्पसंख्याक समाजातील वस्त्यांचाही विकास व्हावा, यासाठी शासनाने हे प्रस्ताव मागविले असतानाही हे प्रस्ताव पडून असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष माने यांच्या लक्षात येताच त्यांनी यासाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर या विकासकामांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी शासनाने निधी दिला असून, तो जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींमार्फत तो खर्च करण्यात येणार आहे. लवकरच ही कामे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक वस्त्यांमधील गेली अनेक वर्षे रखडलेली रस्ते डांबरीकरण, खडीकरणाची कामे मार्गी लागणार आहेत. या विकासकामांना मंजुरी मिळाल्याने अल्पसंख्याक समाजाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)