शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राहुल गांधींनी तीच चूक केली, जी सोनियांनी गुजरातमध्ये केलेली; मोदींची ताकद ओळखताच आली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 13:36 IST

अशोक गहलोत यांनी कामाच्या जोरावर प्रचार केला होता. यातून धडा घेतला नाही तर २०२४ मध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

काँग्रेसच्या हातून राजस्थान गेले आहे. याला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला पनौती हल्ला विविध कारणांपैकी एक असल्याचे तिन्ही राज्यांचे निकाल दर्शवत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये राहुल गांधींनी केलेली वैयक्तीक टिपण्णी कारण ठरली आहे. राहुल यांनी तिच चूक केली जी सोनिया गांधी यांनी गुजरातमध्ये केली होती. पुन्हा एकदा राहुल गांधी मोदींची ताकद ओळखण्यात चुकल्याचे राजकीय धुरिणांमध्ये बोलले जात आहे. 

 सोनिया गांधी यांनी गुजरात निवडणुकीवेळी मोदी यांना मौत का सौदागर म्हटले होते. त्याचा परिणाम सर्वांना माहिती होता. तोच परिणाम उत्तरेकडील तिन्ही राज्यांच्या निकालांमध्ये दिसल्याचे बोलले जात आहे. अशोक गहलोत यांनी कामाच्या जोरावर प्रचार केला होता. परंतू, राहुल गांधी यांनी एका सभेत वर्ल्डकपमध्ये भारताची हार आणि मोदींची स्टेडिअममध्ये उपस्थितीवर मुद्दा छेडला. टीम इंडिया आरामात वर्ल्ड कप जिंकली होती. तिथे पनौतीने हरविले, टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, परंतू जनतेला माहिती आहे, असे राहुल म्हणाले होते. या ३० सेकंदांचा व्हिडीओ देखील काँग्रेसने ट्विटरवर टाकला होता. 

सोनियांच्या यांच्या टीकेनंतर जशी काँग्रेस गुजरातमध्ये पिछाडीवर गेली तसाच परिणाम राहुल यांच्या वक्तव्याचा राजस्थानमध्ये दिसला. मोदींवर वैयक्तिक हल्ला हा विरोधकांवरच संकट आहे हे यातून समोर येत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोदींवर हल्ला करणे टाळले होते, त्याचा फायदा तिकडे मिळाला होता. यावरून येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने यापासून धडा घ्यायला हवा, असेही राजकीय तज्ञ म्हणत आहेत. मोदींवर असेच वैयक्तिक हल्ले झाले तर २०२४ मध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी