शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी तीच चूक केली, जी सोनियांनी गुजरातमध्ये केलेली; मोदींची ताकद ओळखताच आली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 13:36 IST

अशोक गहलोत यांनी कामाच्या जोरावर प्रचार केला होता. यातून धडा घेतला नाही तर २०२४ मध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

काँग्रेसच्या हातून राजस्थान गेले आहे. याला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला पनौती हल्ला विविध कारणांपैकी एक असल्याचे तिन्ही राज्यांचे निकाल दर्शवत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये राहुल गांधींनी केलेली वैयक्तीक टिपण्णी कारण ठरली आहे. राहुल यांनी तिच चूक केली जी सोनिया गांधी यांनी गुजरातमध्ये केली होती. पुन्हा एकदा राहुल गांधी मोदींची ताकद ओळखण्यात चुकल्याचे राजकीय धुरिणांमध्ये बोलले जात आहे. 

 सोनिया गांधी यांनी गुजरात निवडणुकीवेळी मोदी यांना मौत का सौदागर म्हटले होते. त्याचा परिणाम सर्वांना माहिती होता. तोच परिणाम उत्तरेकडील तिन्ही राज्यांच्या निकालांमध्ये दिसल्याचे बोलले जात आहे. अशोक गहलोत यांनी कामाच्या जोरावर प्रचार केला होता. परंतू, राहुल गांधी यांनी एका सभेत वर्ल्डकपमध्ये भारताची हार आणि मोदींची स्टेडिअममध्ये उपस्थितीवर मुद्दा छेडला. टीम इंडिया आरामात वर्ल्ड कप जिंकली होती. तिथे पनौतीने हरविले, टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, परंतू जनतेला माहिती आहे, असे राहुल म्हणाले होते. या ३० सेकंदांचा व्हिडीओ देखील काँग्रेसने ट्विटरवर टाकला होता. 

सोनियांच्या यांच्या टीकेनंतर जशी काँग्रेस गुजरातमध्ये पिछाडीवर गेली तसाच परिणाम राहुल यांच्या वक्तव्याचा राजस्थानमध्ये दिसला. मोदींवर वैयक्तिक हल्ला हा विरोधकांवरच संकट आहे हे यातून समोर येत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोदींवर हल्ला करणे टाळले होते, त्याचा फायदा तिकडे मिळाला होता. यावरून येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने यापासून धडा घ्यायला हवा, असेही राजकीय तज्ञ म्हणत आहेत. मोदींवर असेच वैयक्तिक हल्ले झाले तर २०२४ मध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी